सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

मोबाईलची लावणी----- ----

मोबाईलची लावणी----- ----

सिमकार्ड नवे,ड्युएल हवे
राया जरा तुमीच इचार करा
माझा मोबाईल रिचार्ज करा!!धृ.!!

त्यात फोटूची सोय तर हवी
ब्याटरी बी पावरबाज नवी
लई गाणी रिकार्ड व्हावी
कानी कर्णे लावून ऐकावी
हातात घेऊन ऐटीत त्याला झोकबाज कव्हर करा !!१!!

कुठलेबी कार्ड चालेल
प्रीपेडची सुविधा असेल
राती मेसेज तुमचा येईल
माझा रिप्लाय लगी जाईल
रंग तांबडा,फोन देखणा न्यारा त्याचा नखरा !!२!!

त्याला कव्हर मी घालीन
नित हृदयाशी ठेवीन
तुम्हासंगे रोज बोलीन
असा फुलावानी झेलीन
हातात माझ्या देऊन त्याला हात हाती धरा!!३!!

बीअर फक्त बीअर नाही

बीअर फक्त बीअर नाही
तुझ्या माझ्या स्टोरी चा थ्रील्लर आहे
तू आलीस तेव्हा celebration
गेलीस तर परत हिनेच दिला साथ माझा
आणि केले tension चे temporary stop function...

बीअर फक्त बीअर नाही
तुझ्या माझ्या स्टोरी चा थ्रील्लर आहे

तुझी हि सवत आहे असे तुला वाटायचे
पण खर तेच आहे हे राहिले तुला सांगायचे
तू नसताना हीच माझ्या सोबत असायची
तू असताना सुधा हि कधीच साथ नाही सोडायची
म्हणून दिला तुला सोडून पण नाही सोडू शकलो BEER.

मूल आई पेक्षा मोठ कस होईल

साथ स्वतःचीच जर असेलं स्वतःला
परक्या जगात आपलंही मग सहज निभवतं,
साथ दुसऱ्याची जर कधी बाळगली मनी
कालांतराने ते मागण साथीचही मन उबवतं..!!




डोळे मिटले की तू दिसतेस
डोळे उघडले की हे जग !
तुलाही मी दिसतो का ?
जरा डोळे मिटून बग......





सांत्वन म्हणजे दुखांच मूल. मूल आई पेक्षा मोठ कस होईल ?
मूल मोठ ह्वायला लागल कि आई आणखी मोठी व्ह्यायला लागते. म्हणून समजूत घालणार कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुखातली व्यक्ती रडण एका क्षणात विसरू शकत नाही.

तुझ माझ्यावर अन माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे..

माझ्यातला ईश्वर कदाचित
पंगु झालेला दिसतोय
नाहीतर मी कशाला उगा
दगडांचे पाय धरतोय..?




तुला दूरून पाहताना....
डोळ्यातील अश्रूही मोहून जायचे...
त्यारात्री मग आकाशात..
चंद्र ऐवजी तुझेच रूप दिसायचे..




मनी भाव आज
अश्रू वाटे वाहतायत
होठ जरी असेल अबोल
डोळ्यांनी डाव साधलाय


खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे..

भूतकाळाचा पडदा वर्तमानाच्या डोळ्यांवर

खुललेली प्रीत सख्या
मना वेड लाऊनि जाते
रूप मेहंदीच घेऊन मग ती
......तुलाही रंगवून जाते !


भूतकाळाचा पडदा
वर्तमानाच्या डोळ्यांवर
भविष्य धडकले
आंधळ्या वर्तमानावर...



संध्याकाळ ती उतरली
तिन्हीसांजेच्या तळी
तळ्याकाठच्या झाडावरती
हुरहुरणारी एक कळी....
फुलू पाहते ती वेडी
नाजूक स्पर्शास आसुसली
खुडू नका हा जन्म माझा
फुल होण्यास तरसली...
उगवेल सकाळ ती
गंध फुलांचा दरवळेल
कोमेजलेल्या कळीला
जेव्हा जगण्याचे वरदान मिळेल..

श्वास तुझे असताना जगते मी

तुझ्या विचारात सख्या रमते मी

आठवोस तू पण जळते मी

श्वास तुझे असताना जगते मी

दिवस असो कि रात्र

कधी विसरते कधी आठवते तुला मी

खेळ हे प्रीतीचे खेळतोस तू

पण कधी जिंकते कधी हरते तुला मी..

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..

तुझ्या मिलनाची..
साक्ष देतोय हा किनारा.
त्याच्या प्रत्येक लाटेवर..
आपल्या प्रितीचा शहारा..


तुझ्या त्या गोड आठवणी
मला स्वप्नातून तुझ्या जवळ आणतात....
तू माझ्या हृदयात अशी काही रुझली आहेस की
तो देव ही आपल्या प्रेमाचा साक्षी बनला आहे.


होऊनी वाळू मी किनारी असावे
स्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे
कधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे
संध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे..


प्रत्येक क्षणाला आठवण तूझी..
शांत मनात या लहर तुझी..
तरी का नाही झाली तू माझी..

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..
का कुणास ठाऊक हे असे का घडले..
शहाण्या सारखा वागलो तरी तुझ्या वरच सारं अडले..

परक्या सारखं तुझ्याशी नाही वागता येत मला..
वारयासंगे उनाड त्या नाही वाहता येत मला..
रणांगनात या प्रेमाच्या नाही जिंकता आलं मला.

आपलं नात म्हणजे.. तो अथांग सागर अन किनारा..

मी गूंफली माळ...
माझ्या स्तब्द शब्दांची..
तुला ती कळली नाही...
विखूरळी ती माळ भावनांची..


आज वेळ माझ्या हाती असती,
कुंकू माझ्या नावाचे तुझ्या माथी असते..
का कुणास ठाऊक वेळेने हा दगा केला..
माझ्या जन्मा आधीच तुला जन्म दिला...




काल पुस्तक वाचताना...
त्या तुझं नाव वाचनात आलं...
थोडा वेळ स्तब्द होऊन त्याला पाहीलं..
हळूच ते पापण्यांनी भिजून गेलं..



झालं गेलं विसरुन जा..
प्रत्येक जण सांगत असतो..
तुझ्या पासून दुर जाण्याचा..
सल्ला प्रत्येक जण देत असतो..




माझ्या नावातचं सामावला..
तुझ्या नावाचा पसारा...
आपलं नात म्हणजे..
तो अथांग सागर अन किनारा..




मी तिथेन असेन..
त्या सागराच्या किनारयाशी..
तु मात्र जपुन ये..
नजर आहे तूझ्यावर सर्वांची..

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,

तुझ्या सोबत मला भिजायचयं..
या मुसळधार पावसात..
मिठीत माझ्या आलीस की..
मिसळून जातील श्वासात श्वास...


मिठीतली तू माझ्या..
नकळत माझी होऊन जातेस..
तो क्षण होतो धुंद...
अन हृदय एकमेकाला बिलगून जाते..



हृदयाला भिडले हृदय..
दोघे होतात गुंग...
मन मात्र एकटे...
पुढील विचारात दंग...



एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला.......
एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला ,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला......
एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
... त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला.....
एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला....

जय जिजाऊ ....

नको अता विझता दिवा,मज ज्योत पाहिजे
नभी छेदणारा वादळी असा झोत पाहिजे

माझ्याच पोटी मला एकदा माझी लेक होऊ दे
जगेन नीर्भई ,कशा सोबती गणगोत पाहिजे

अत्याचार ,अन्याय का म्हणून नशिबी घेऊ
नराधमी जगलात या,वाघिणीची जात पाहिजे

नवी उशा तूच हो तुझ्यातुनी,दाहीदिशा उजळूनी
जुन्यावरी कर मात तू,नवी कोरी बात पाहिजे

हो जिजाऊ,कधी झाशीची राणी,पाठी आई भवानी
दुष्ट मनसुब्याना जाळण्या,धग धगती वात पाहिजे

तुझ्या साठी आणलेला गजरा..

तुझ्या माझ्या प्रेमाचा..
बघ चोहीकडे पसरला सुगंध...
तू हसलीस गालात अन...
फुलून आला निशिगंध...



लगेल कधी अंगाला तुझ्या..
हळद माझ्या नावाची....
येता जाता हसत असते...
ती वाट तुझ्या गावाची..



तुझ्या साठी आणलेला गजरा..
फ़ुलला होता पाहून तुझा चेहरा हसरा...
तुझ्या येण्याची वाट पाहून जो...
सोडत होता जो प्राण बिचारा...

माझी सुट्टी.. ती धमाल तुझी

मीच मिचत्या डोळ्यांनी
हवासा तू वाघोबा करायची
मुरडलेल्या नाकाला तुझ्याच
तू छानस मुंगुस म्हणायची

छोटासा तो फ्रॉक नेसवून
त्या बाहुल्यांना वेणी करायची
इवल्या हातभर बांगड्या घालून
पडत-उठत घरभर फिरायची

माझी सुट्टी.. ती धमाल तुझी
पाठी बसून माझ्या मला घोडा म्हणायची
दमून दमून इवलासा जीव
बिलगून मला,तिथेच निजायची

आजी-आजोबांची लाडकी तू
ती अख्या चाळभर फिरायची
मंदिरातल्या बाप्पाला साखर देऊन
प्रार्थनेत आईस स्क्रीम मागायची

कार्टून बघायला वेळच वेळ तुला
अभ्यासाच्या नावाने दूर पळायची
जेवायचा तुला कंटाळा फार..
घाई ती आजीच्या तोंडून गोष्टी ऐकायची

घर म्हणजे आमचे तीच जणू ...
दिवसाची करंगळी ती हळूच सोडायची
इवल्याश्या श्वासांचा आराम तो
नाजूक पापण्यात आम्हाला घेऊन निजायची

कोमेजलेल्या तुझ्या आठवणींना..

तुझ्या माझ्या प्रेमाची साद...
देते ती संध्याकाळ ची वेळ...
तुझे खुदकन हसणे - रुसणे..
आणि तो जिवघेणा खेळ..




तूझी आठवण आली की..
मनाला सतावतो तो..
या चारोळीचा..
पहीला शब्द...



नकळत माझ्या ह्रदयाने...
तूझ्या हृदयाला घातलेली साद..
तूझ्या हि हृदयाने मग दिलेला...
तो प्रेमळ प्रतिसाद...



कोमेजलेल्या तुझ्या आठवणींना..
पुन्हा नव्याने बहर येऊ दे..
पुन्हा एकदा हृदयात माझ्या...
त्यांना कहर करू दे...


का बोलली ती अशी,
"एवढा नको रे वेडा होऊ मझ्यासाठी,
मी नही रे तुझ्यासाठी....."
आता कसं सांगु तिला की, "
हे जगणं फक्त तुझ्यासाठी...

येईल मी परतून तुझ्यासाठी सखे

तुज ते मिठीत येण
अन मज स्वतःलाच विसरून जाण
जणू परिमलचा सुवास तो सख्ये
हवेत दरवळून जाण



वळवाचा पाऊस हि
भिजवतो मनाला
तरी सख्ये दोष
तुज श्रावणसरीना



येईल मी परतून तुझ्यासाठी सखे
वाट बघ माझी पौर्णिमेच्या चांदण्यांत,
अवचित उभा राहील तुझ्या समोर
मग्न असशील जेव्हा प्राजक्ताच्या अंगणात..!!


काजळी भरलेलं डोळ्याची ती किनार
मखमली होटाची ती हुनर
मदमस्त तो तिचा बांधा
त्यांनीच केला आहे जगणायचा वांदा



आवडेल मला जाणून घ्यायला...
काय दडलंय तुझ्या मनात..
नाहीच जाणता आले तर..
सांगशील ना हक्काने कानात..

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम,

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम,
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम,
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम,
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम,
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम,
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम,
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम,
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम,
मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम,
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम,
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम,
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम,
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम,
सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम,
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम,
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम,
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम,
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम,
वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम,
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम,
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेमथांबवलं तिनेच मला,
सांगण्यापुर्वीच माझं प्रेम,
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम,
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाला अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम.

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

खोपा जीवाचा बांधला

खोपा ....

खोपा जीवाचा बांधला
काडी काडी जीव येचून
कवा झुरला तो कवा झुलला
जीव जिवाले रायला टांगून

कवा झाली मी लेक, कवा माय
एका जीवाची शिदोरी राखून
घासा घासात जीव जगवला
चोची भरवले पिला,उपाशी राहून

खोपा माया म्हणवला म्या
फक झाडले,पिला सुखात ठेऊन
भीती जीवा लागली रे देवा
बळ येता पंखा,पिलं जातील उडून

जीव झाला रे म्हतारा आता
ओल आली खोप्या,एकटी रडून
सांभाळले जे,हारपले सारे
रायला,मायासंग खोपा एकटा पडून

नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,

सकाळी बसमध्ये झालेल्या नाट्यमय अपघातावर सहज केलेलं मनोगत, आशा आहे तुम्हालाही ते आवडेलं.....:D

"आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं,
बसमध्ये चढल्या सुंदरीशी थोडक्यात भेटवून गेलं!!

गर्दीमधून वाट काढत निघाली जसा जवळ आला Stop ,
बट सारत मुखड्यावरची सळसळत नागीण Non - Stop !!

नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,
माझ्या Bag च्या चेनला अडकून ओढणीने तिच्या केला घात!!

ताणली जशी ओढणी वळून बघितलं......आहा....नजाकत,
धरून हातात भरजरी ओढणी दिली खल्लास Smile लाजत!!

व्यर्थ गेला सोडविण्याचा तिचा मिनिट भराचा खटाटोप,
सर्वांच्या मिश्कील नजरेतून होत होते Dramatic आरोप!!

हसती तिची नजर मात्र खिळली होती माझ्यावरचं जराशी,
जेव्हा तिची मैत्रीण खेळायला लागली चेन आणि ओढणीशी!!

शेवटी न राहवून मीचं केला प्रयत्न सोडविण्याचा तो गुंता,
मलाही जमेना शेवटी तिच्या मधुर आवाजानेचं भंगली शांतता!!

Plz ....तोडा आता ते धागे मला कॉलेजला खूपचं झालंय लेट,
चेहऱ्यावरचे अगतिक भाव पाहून तिच्या मीही मग तोडले थेट!!

हसत गेली पुढे निघून मिळाला उतरतानाचा एक ओझरता कटाक्ष,
आधीचं सुखावलेल्या चातक मनावर Sollid मोरपिसं फिरली लक्ष!!

खटकन तुटले सखे ते खट्याळ धागे तुझ्या भरजरी ओढणीचे,
पण भास आभासात नकळत कुठेतरी जुळले धागे दोन मनांचे!!

सांग सालस हरिणी परत अशीचं मुद्दामहून कधी भेटशील का??
Bag ला नाही आता माझ्या अधीर दिलालाचं अडकशील का??

शान पुण्यनगरीची जिथं सारसबाग मानाचा तुरा

जे काही दिव्य आणि उदात्त असत
ते इतकं सहजासहजी मिळत नसतं
,ते इतकं सहजासहजी मिळालं असतं,
तर मग त्याला इतकं महत्व कस आल असतं.


जगरहाटीच्या गाडग्यात
माणुसकीला तिलांजली,
फक्त माणूस उरला आता
मात्र मानवता गंजलेली..!!


सगळेच लागले होते मला...
तुझ्या नावाने चिडवायला...
तुला ते कधीच कळले नाही...
पण ते मला लागले होते आवडायला..


आभाळाचे डोळे भरून येता
तो बरसतो असा
तुझ्या आठवणींचा पाऊस
डोळ्यावाटे बरसावा जसा


तुला आवडायचे फुल...
म्हणून मी रोज घेऊन यायचो..
तुला आवडायचो मी...
म्हणून मी फुलून यायचो..



शान पुण्यनगरीची जिथं सारसबाग मानाचा तुरा
कर जुळती दोन्ही मधोमध रावळात विघ्नहर्ता,
आनंदाची खैरात तळ्यात पुणेरी तोऱ्याचं प्रतिबिंब
"हिरवळी" सोबत गवसते जिथे मनाची प्रसन्नता..!!




मीच तर दोषी असतो,
प्रत्येक वेळेस...
विनाकारण तुला रडवायचे..
अन मग कोपऱ्यात जाऊन रडायचे..



नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..!!

नाती सांगायची नसतात,स्वतःच समजायची असतात.

नाती सांगायची नसतात,स्वतःच समजायची असतात.
ओठांमधून न सागता,मनातून जपायची असतात।


तुझ्या प्रत्येक शब्दाला माझा होकार आहे
माझ्या प्रत्येक व्यथेला तुझाच आधार आहे..



इंद्रधनुष्याचे रंग खरंच कीती सुरेख दिसतात पण आपले डोळे ओले होतात जेव्हा ते आयुष्यात उतरतात सप्तरंगी इंद्रधनु आकाशातच चांगलं वाटतं आपल आयुष्य माञ आपल्याला एकाचं रंगाच हवं असतं.

म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच..

म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच..
मग कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं,
काय करते आता ती? कुठे आहे सध्या?
मग लक्षात आलं,
अरे! आपण तर पुरतेच विसरलो तिला...

खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.

मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...

पण असं काहीतरी घडलं,
आणि................
आता कशी असेल ती? कुठे असेल ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्‍यात येत राहीले...

आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...

मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे?

थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते का आता?

थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे, ती काही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....

तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते....

मग आवाज आला, ऐकतोयस ना!!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस,
असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला...

आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...

तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....

तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,
नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच......... !!!

मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...

असं वाटतंय कि तू मला विसरलास मला...
अशीच सुरुवात होती...

कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण कधी ना कधी नक्की येईल,
पण तू दु:खी होऊ नकोस,
स्व:ताची काळजी घे,
खूप मोठा हो,
स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...

खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात अडकून राहिला होता,
पण तू नाही आलास,
मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!

या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही.......
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे?????..........

सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी

सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी
प्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात

तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात...

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

९ नऊ तासाच्या प्रवासात..

मित्रांनो मी हा एक नवीन प्रयत्न केला आहे.. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा..

९ नऊ तासाच्या प्रवासात..
७ सात तास तर तू शांत होतीस..
० शून्यातून मी सुरवात केली..
२ दोन क्षण वाट पहिली..
3 तिनदा तुझ्या प्रेमात पडलो
९ नऊ तासाच्या प्रवासात..
१ एकदा मलाच शोधात राहिलो..
२ दोनदा तुझे सहकार्य मिळाले
० शून्यातून सुरवात केली...
७ सात तास तर तू शांत होतीस.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

मराठी चारोळ्या

जमेल का ग तुला आता..
जुन्या आठवनींत हरवून जाणे..
आडकूशीला लपून छपून..
मला चोरून पाहणे..



आज ही तुझी मी..
आतुरतेने वाट पाहतो
तु आली नाहीस की..
हळूच डोळ्यातून अश्रु वाहतो




तुला ठेच लागताच..
इजा मला होई...
चुक काही तू करता...
सजा मला होई..


आज तु बोलता बोलता..
मध्येच अशी थबकलीस...
जशी तुझ्या मनात क्षणभर...
माझी आठवन जपलीस...


सरता सरेना ही रात्र...
आता स्वप्नांची चाहूल लागली..
दिवसा ढवळ्या मिरावलेली...
रात्री त्यांची काहूर माजली.


तू चिंब भिजाविस म्हणून,
मी थेंब होऊन बरसलो...
तुला भिजताना पाहायला मी..
त्या पावसाच्या सरीत लपून आलो..


लाल लाल लालीने
ओठ तुझे रंगलेले...
तुझ्या एका स्पर्शा साठी...
ओठ माझे आसुसलेले..


मनात सत्य असेल..
तर प्रत्येक गोष्टीला समोरे जाता येते..
कटू पणे वागाल तर...
सर्व काही निरर्थक होते..

मराठी चारोळ्या

रोज वाटत निजताना
आज हि आकाशाला भिडणारी
छान छान स्वप्न पहावी
पूर्ण करण्याची जबाबदारी माझी
पण स्वप्न मात्र तुझ्या कुशीत दिसावी


मी अजूनही..
तुझ्या भेटीला आसुसलेला ..
तू आली नाहीस कि ...
प्रत्येक पापणीवर अश्रू तरळलेला ..


गर्दीत असूनही मी...
आता एकटा आहे...
तुझ्या आठवनिंनीच वेढलंय मला...
अन त्यात तूच फक्त आहेस...


आठवणींचा झुला...
गेला बघ आभाळा...
मला पुन्हा यायचं...
तुझ्या संगे झुलायला


कधी ओळखता नाही आले...
माझं मन तुझ्यातच गुंतलेले...
तू मात्र शोधात राहिलीस...
त्याला इकडे तिकडे..


तुझ्या साठी झालो होतो मी...
या जगाला अपरिचित...
तू सोडून दूर गेलीस..
अन पडलो होतो मी क्षणभर निपचित...


दर वेळी मी तुझी वाट,
पाहत थांबायचे ..
तू मात्र उशिरा येऊन...
तुझे हक्क लादायचे..


तुझी नजर चुकून बघताना...
मनात एक भीती होती...
पण तू पण मला पाहत असशील...
अशीच काही मनात नीती होती..


तू नटून थटून आलीस...
मनाचा माझ्या तर छेडल्यास...
रुंद तुझ्या कपाळावर...
माझ्या नावचा चंद्र कोरलास..

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

कवी - अज्ञात

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

कोळ्यांची मुम्बादेवी, हौसेने नटली,

बघता बघता इकडे, मुंबा नगरी वसली.

मराठमोळी माणसांची, मराठमोळी वस्ती.

कोणाची नाही फ़िकर, कोणाची नाही धास्ती.

मुंबईच्या नावाने, उजळला मराठी माथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या सुखापासुन, लांब तिथे दूर.

बिहार आणि यूपी मध्ये, होता भ्रष्टासुर.

त्यांच्या लोकांचे होते, जेवणाचे हाल.

सर्वांनी साद घातली, "बंबई हमें पाल".

मराठीने त्यांना दिला आपला अर्धा वाटा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईमध्ये हळुहळु, झाली भरभराट,

सर्वांना दिसे इथे, भाग्याची पहाट.

देशाच्या सर्व भागांतून, लोक इथे आले.

मुंबईने सर्वांना आपलंसं केले.

सारी तिची लेकरे, सर्वांची ती माता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

टॅक्सीवाला सरदारजी, कलईवाला खान.

मुम्बईत पहायला मिळे, सगळा हिंदुस्तान.

मुंबईने सर्वांना, घेतलं आपल्या कुशीत,

घर दिलं, माया दिली, सगळे होते खुशीत.

मुंबईचे गुण गायी, सर्व येता जाता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आधी आधी वाटले, सारे मुंबईकर.

हळुहळु पाहुणा बसला छातीवर.

जिथे हवं थूंका, जसं हवं रहा,

मुंबई गेली खड्ड्यात, पैसा तेवढा पहा.

"यूपी बिहार के लियेही बंबई बना था."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

बघता बघता मुंबईत, वाढु लागली गर्दी.

"गर्दीने तो बम्बई की, हालत पतली कर दी."

मुंबईत सगळीकडनं, माणसांचा लोंढा आला.

मुंबईतला मराठी, दिसेनासा झाला.

"तुम्ही कोण? मराठी? अंबरनाथला राहता?"

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईतुन मराठी, झाली कुठे गुल?

मराठींनाच दाखवी बोर्ड "हाउस फ़ुल".

जे जे आले मुंबईला कामधन्द्यासाठी.

सीमापार केली त्यांनी माय मराठी.

मराठी मातीमध्ये, बाकीच्यांच्या बाता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

म्हणायला मुंबई होती आर्थिक राजधानी.

पण तिची झोळी, सदैव रिकामी.

साद घाले दिल्लीला, बनवुन द्या हो रस्ते.

दिल्ली म्हणे नाक उडवुन, "माफ़ करो, नमस्ते.

सारा धन हमारा, पहलेही कहा था!"

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या जमीनीवर, गर्दी गेली वाढत.

बघवेना फुगलेल्या मुंबईची हालत.

जागोजागी फ़ेरीवाले, पावलोपावली घाण.

एकेकाळी होती जिथे सोन्याची खाण.

ज्यांना दिली माया, त्यांच्याच खाई लाथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

अमराठी वोटेबँकने रोवले इथे पाय.

तेव्हा त्यांच्या नेत्यांना, सुचला एक उपाय.

"चला आता मुंबईतुन आपले खिसे भरु.

मुंबईचे सुद्धा आता, यूपी बिहार करु.

मुम्बाईच्या जमीनीला नासवुया आता."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

दिवसेंदिवस वाढत गेली, बाहेरच्यांची नशा.

बघता बघता मुंबईची, झाली दुर्दशा.

"अश्रू कोणी बघु नये, डोळे तिचे झाका.

दु:ख तिने सांगु नये, तोंड शिवून टाका."

चालु राहिला अखंडीत, लुटण्याचा सपाटा.

एक होती मुंबई. तिची ऐका गाथा.

मुंबईने जेव्हा आपली, व्यथा सांगितली,

मिडियाने देशामध्ये, जी आग ओतली.

आपल्या जागी मराठीच, झाला बंडखोर.

शिवरायांच्या जमिनीवर, मराठीच चोर?

मुंबईची कैफ़ियत, आता पुढे वाचा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आजही मराठी भाकर अर्धी अर्धी खाईल.

तुमच्या बरोबर मुंबईच्या, पदराखाली राहील.

पण आदर तिचा केला नाहीत, तर याद राखा!

सपाटुन पडेल, मराठी तडाखा.

घाईघाईत पकडायच्या, घराकडच्या वाटा.

एक होती मुंबई, तीची ऐका गाथा.

काय म्हणता नितिशजी, पासवान आणि लालु?

मराठींच्या व्यथेवर, राजकारण चालु?

बिहारमध्ये लावली तशी आग नका लाऊ.

संतांच्या महाराष्ट्राचा, अंत नका पाहु.

तुका म्हणे "नाठाळाच्या काठी हाणु माथा."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.
--

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

ती दिसायची मला बंद डोळ्याने

ती दिसायची मला बंद डोळ्याने
हव्या ह्व्याश्या स्वप्नांमध्ये
माझया घट्ट मिठीत विरघळताना
तिच्या कपाळावरची ती बट सावरताना
तिच्या ओढनिशी खेळताना
लाजत हस्ताना माझया बरोबर जगताना
तीच नसन् मी तीच असन केल
तिच्या अठवंनिंतून तिला जिवंत केल
एका विसंगतीला सुसंगत केल
मी स्वप्णाना जगत गेलो अस्तित्वाला विसरून
तिला स्मरत बसण्यापेक्षा तिचाच होऊन
विरहात जगन्या पेक्षा कल्पनेत जगून

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावरच्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही ,
कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा....



कुणीही यावं अन हळूचं वाजवून जावं
घंटा मंदिरातली आजकाल झालंय प्रेम,
निपजली चांगली तरंच मधुर घंटानाद
अन्यथा वाजवणाऱ्याचाही काय नेम..!!

काय असतं प्रेम..??

मायेचा शीतल ओलावा की
अश्रूंचा हक्काचा गिलावा,
मनातली प्रेमळ भावना की
विरहातील विवंचना..!!

एक तळपत सूर्यकिरण की
धगीत जाळणारं सरपण,
रातीचा शांत चांदवा की
अगतिकतेतलं दुबळ मरण..!!

पवित्र असं गोमूत्र की
कोड्यात टाकणार सूत्र,
देव्हारीच्या देवाचं देवपण की
उकिरड्यावरचं मोकाट कूत्र..!!

शिंपल्यातला अनमोल मोती की
वाळवंटातील तप्त माती,
आठवणींनी भरलेलं हृदय की
श्वास संपलेली छाती..!!

पावसात भिजता चातक की
नशिबाने केलेलं पातक,
सुखदायी सुवर्ण सोहळा की
जन्मभराचं सुतक..!!

काय असतं प्रेम..??

प्रवासात सगळेच अनोळखी असतात ...!

प्रवासात सगळेच अनोळखी असतात ...!

म्हणून प्रवास टाळायचा नसतो ..

कारण त्यातला एक प्रवाशी ..

आपल्यासाठी थांबलेला असतो ...

जीवनात सगळंच मिळत नाही ..

म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो ...

कुठल्यातरी वळणावर आपली वाट पाहणाराहि असतो ..

एखाद्याला आपलं करता आलं नाही ..

म्हणून जीव जाळायचा नसतो ...

जीवनाचं संपल्यावर आपण त्या व्यक्तीच्या सहवासालाही मुकतो ..

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात ...

म्हणूनच माणसे उमलतात आणि फुले कोमेजतात ..

आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले.

सोडू नकोस ग कधी सखे मुलायम केस तुझे मोकळे
आधीचं झगमगाट सौंदर्याचा त्यात रेशमी हे सोनेरी,
सालस मुखडा खुलतो बटांच्या मोहक मिलाफात
नजर ठरत नाही बट सारताना जेव्हा होतेस तू बावरी..!!



सुखाचं पडणार हळुवार चांदण आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवलं,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं,
आपल्यासारखी गोड माणस भेटत गेली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले.
वले.

अगर बेटा वारस है,

अगर बेटा वारस है, तो बेटी पारस है l
अगर बेटा वंश है, तो बेटी अंश है l
अगर बेटा आन है, तो बेटी शान है l
अगर बेटा तन है, तो बेटी मन है l
अगर बेटा मान है, तो बेटी गुमान है l
अगर बेटा संस्कार, तो बेटी संस्कृति है l
अगर बेटा आग है, तो बेटी बाग़ है l
अगर बेटा दवा है, तो बेटी दुआ है l
अगर बेटा भाग्य है, तो बेटी विधाता है l
अगर बेटा शब्द है, तो बेटी अर्थ है l
अगर बेटा गीत है, तो बेटी संगीत है l
अगर बेटा प्रेम है, तो बेटी पूजा है l

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

किती सुंदर आहे हे जीवन,

किती सुंदर आहे हे जीवन,
स्वप्ना पलीकडे सगळे घडते,
कधी तरी विचारात असलेले क्षण मी आज जगते.

तू असताना मी हे जग विसरते,
फक्त तुझ्या सोबत ते क्षण सावरते,
कितीदा तरी माझ्यातच मी हरवते,
तुझ्या नजरेला नजर मिळताच मी नजर झुकवत,

मी अवस्थ, गोंधळलेली असते,
तू माझ्या विचारांची गती भापण्याच्या प्रयत्नात असतो,
तुला जसेच माझ्या मनातले गोंधळ कळते,
त्या क्षणी माझी मीच लाजते.

तू नसताना खूप काही बोलायचे असते,
पण मनातली गोष्ट मनातच राहते....

हि नवी प्रभात , पण तेच आकाश,

हि नवी प्रभात , पण तेच आकाश,
तेच आहे घरटे आणि परत तेच कामाचे भार आज,
गरम गरम चहाच्या प्याल्याने केली आहे सुरवात,
बाप्पा आज चा दिवस असुदे खास,
सर्वाना दे शुभ दिवसाचा आशीर्वाद...

हसणाऱ्या गुलाबाला दु :ख नसतं

आपलं नात वर्णन करण्याचा सखे
नको करू कधीचं मनातून अट्टाहास,
महानांची महानताही थकली जिथे
जेवढा वर्णावा तेवढा आभासी आभास..!!




हसणाऱ्या गुलाबाला दु :ख नसतं
असं आपल्याला वाटतं ,
पण त्याच दु:ख खरं कि खोटं
हे आपल्याला कुठे कळतं ?

आयुष्यात प्रेम करून पहावंच...

आयुष्यात प्रेम करून पहावंच....
जमलं तर उत्तमच नाहीतर दुःख.. पण प्रयत्न केल्याचं समाधान लाभतं....
ओठांवरती आलेलं आपण जीभ चावून पचवून नेतो..
मनामधलं सारं काही नकळतपणे तिच्या डोळ्यांत पाहत उलगडत जातो..
समोरचं जाणून घ्यायला अधीर आपण, आणि काळीज कीराल्म गेलं तरी सोसणारे आपणच...
तरीही रांगत गेलेलं आपलं प्रेम, तिच्या आधाराची वाट पाहतं, आणि शेवटी स्वतःलाच उभं करून गातं...

आज मी एकटा नाही

आज मी एकटा नाही
दुख आहे, एकांत आहे
एक संध्या सोबत निवांत आहे

एक स्तब्ध सांज-तारा आहे,
दूर सुटलेला किनारा आहे
या सर्वाहून ही मोठा असा आयुष्याचा पसारा आहे

एक वाट चुकलेला रस्ता आहे
आयुष्यभर खाल्लेल्या खस्ता आहेत
असे विचार मनी का, तर म्हणे मरण ही या कलयुगात स्वस्त आहे

तुझे प्रेम म्हणजे, माझ्यासाठी नवा अनुभव आहे,

*
तुझे प्रेम म्हणजे, माझ्यासाठी नवा अनुभव आहे, कधी सुख तर कधी,आठवणीचा पुर आहे...
*

:तुला जेंव्हा माझा कंटाळा येईल त्याच क्षणी मी स्वत :ला संपवीन . तुला न आवडणारी गोष्ट सख्या ,तुझ्यासमोर मी कशी ठेवीन ?
*

l:मराठी चारोळी म्हणजे फेसबुकचा श्वास, मराठीचा ध्यास आयुष्या इतकाच खास, चारोळ्यांचा विश्वास....

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान

अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,
अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!

जस मेल्याशिवा य स्वर्ग दिसत नाही!!!!

प्रेम म्हणजेकाय ते !!!!! जीव लावल्याशिव ाय समजत नाही !!! प्रेम म्हणजे कायते !!!!१ ओढीने जीव कासावीस झाल्याशिवा य समजत नाही !!! ...प्रेम म्हणजे काय ते !!!! जस मेल्याशिवा य स्वर्ग दिसत नाही!!!! प्रेम म्हणजे कायते !!! तिच्या सुखाशिवाय आपला घास गिळवत नाही!!!


हा एकच शब्द. तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो. त्यावर 'विचार' करायला एक मिनिट. ते समजावून सांगायला एक तास. समजून घ्यायला एक दिवस. जाणून घ्यायला एक आठवडा आणि निभवायला एक 'जन्म'




सौंदर्य तुजे वाखण्याजोगे रूप तुझे पाहण्याजोगे ओठ तुझे गुलाबाचे डोळे तुझे मृगाचे केस तुझे मऊ मुलायम जसे स्पर्श मोर पिसांचे पाहताक्षणी मी हरवावे असे जादु तुझ्या नजरेचे माझ्यासाठी जिला तु बनविलास आभार मानु किती त्या देवाचे ....

तू समोर आला की

तुझ्यासाठी भावनांना
शब्दात मी मांडलं होतं
आभाळ भरून आलेलं प्रेम
धाराधारांतून सांडलं होतं





तू समोर आलास कि
आभाळ भरून येतं ,
कळतंच नाही मग
ते कधी रीत होतं !!!!!

वेडे, तूच तर माझं जग आहेस...''

त्याच्या मिठीत विसावलेली ती
अचानक
त्याला
म्हणाली-
'' तूझं माझ्यावर जर खरचं प्रेम असेल तर सगळ्या जगाला सांगून दाखव...''
. . .
. . .
. . .
तिच्याकडे
वळून तो
हळूच तिच्या कानात बोलला-
'' I love you..''
. . . .
. . . .
ती म्हणाली-
'' हे काय करतोयस..?''
.
.
.
.
.
तो तिला जवळ घेऊन म्हणाला-'' वेडे, तूच तर माझं जग आहेस...''

Ji manasa havishi vatatat

Ji manasa havishi vatatat, Ti manasa bhetat nahi,

Ji manasa nakoshi vatatat, Tyancha sahvas sampat nahi,

Jyanchyakade javese va tate, Tyanchyakade jane jamat nahi,

Jyanchyakade jau naye ase vatate, Tyanchyakade javech lagate

Jeva jivnacha khara arth samjato, Teva kaal sampalela asto,

Nasheeb he asach asata, Tyanchyashi japanach vagav lagat ..... .
Jikade neyeel ,tikade javach lagata ......


vaman rao pai

आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे

ताई : दादा आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, काय भेट देऊ ?

दादा : दिसायला कशी आहे ?

ताई : एकदम झक्कास

दादा : मग माझा नंबर दे. :)

सुंदरमुलीभाव खातात...

सुंदरमुलीभाव
खातात...
सहज दर्शन
द्यायला महाग
का होतात?

'सुंदर आहेस' म्हटलं
की तेव्हा नाक
मुरडतात...
पण पुन्हा
पुन्हा जाउन
आरशात का
पहातात?

सुंदरमुलीबोलायला जड
होतात...
पण झलक
द्यायला आतुर
का असतात?

सुंदरमुलीशेफारून
जातात...
'कौतुक' करणाऱ्यालाच
कमी का लेखतात?

'मला आवडलं
नाही' हमखास
सांगतात...
पण 'पुन्हा
बोलायची' वाट
का पहातात?

गेले दोन दिवस झोप नाही, कामात लक्ष नाही...

गेले दोन दिवस झोप नाही, कामात लक्ष नाही...
तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही..
पण प्रत्येकवेळी कुठले कारण शोधू?
अन तिने फोन उचलल्यावर माझे ततपप कसे थांबवू?
बोलायचे असते एक, अन निघते ओठांतून भलतेच..
ती स्वतःतच मग्न, पण कळतं तिलाही सगळं..
तिला राग येईल असे वागून फायदा नाही,
अन इथे माझ्या अस्वस्थतेला तिच्याशिवाय उपाय नाही!
बहाणे तयार करून ठेवतोय, देव पाण्यात घालून बसलोय,
ती प्रसन्न व्हावी ह्याकरिता आराधना करतोय..
दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस, तिचेच स्मरण अन तिचेच चिंतन..
एकदा हो म्हणाली कि चिंता मिटली,
पण ती वेळ लवकर यावी इतकीच माझी घाई!

स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स

आता मी मलाच शोधतोय..
या अवघड वाटेवर...
तुझी कुठवर साथ लाभेल..
मला आता मी शेवटच्या वाटेवर..



स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स

स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं

ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न

ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट

आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,

तुझ्या त्या शब्दाने
मन माझ हेलावल
त्या अंतरीच्या जखमेन
भरून न यायचं ठरवलं



चार दिवस तुझ्या सोबत...
मी मलाच विसरून गेलो..
तू गेलीस निघून दूर...
पण मी तिथेच विरून गेलो...


तू येणार म्हणून सख्या ,
मी पावसाला जायला सांगितल ... त्याने मात्र मला..
तुला भिजवायला सांगितल !!!


आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,
डोर जशीच तुटते सगळेच विसखटतात....

तुझ्या बद्दल लिहायचे ठरवले

तुझ्या हसण्यात होती..
चंद्र तार्यांची सुंदर आरास... तू रुसलीस कि...
व्हायची अमावसेची रात..




काल मी साबणाच्या पाण्याला... फुगे होऊन उडताना पहिले..
त्या प्रत्येक निर्जीव फुग्याला.. सप्तरंगात नटलेला पाहिले...




तुझ्या बद्दल लिहायचे ठरवले .. कि माझे शब्द पुढे पुढे सरावतात.. मी आधी मी आधी म्हणत...
मग स्वतःच शहाण्या सारखे वागतात

नाही आली ढेकर, नाही ओलावले ओठ,

पुरा रिता झाली पियुनिया मधुघट,
नाही आली ढेकर, नाही ओलावले ओठ,
मोगऱ्याच्या फुलाने भरला देऊळाचा गाभारा,
नाही सुवासाची लाट, नाही सुगंधाचा वारा,
चंद्राच्या शितलतेत नाहून निघाले जग,
तरी कुठे सापडेना एक श्वास निवांत,
गळा दाटे हुंदका , अश्रू वाहे झरझरा,
अंतरीच्या दरीत नाही मायेचा वारा,
ज्यात काही नसते त्यात शोधतो आम्ही,
कुबेराच्या तीजोरीतुन ही रिकामे परततो आम्ही ,
कोण्या एका भिखाऱ्याला सापडला हिरा,
फाटक्या त्याच्या झोळीत नाही त्याला हि थारा.............

कसं असत ना प्रेम आधी पडायचं नसतं

कसं असत ना प्रेम
आधी पडायचं नसतं
अन पडल कि फक्त रडायचं असतं......

अचानक कुणीतरी आयुष्यात येत
अन म्हणत मी तुज्यावर खूप करतो
रात्र रात्र जागतो तुज्या आठवणीत
आणि आसवांना तर बांधच नसतो...

मग चालू होतात गप्पा दोघान मध्ये
तू काय करतोस.....मी काय करते....
हळू हळू मैत्री हि होते.....
मग मैत्री म्हणून एका सकाळी
कॉफी साठी भेट हि ठरते...

पहिली भेट दोघानाही तेवढीच उत्सुकता
पहिल्यांदाच भेटतो आहोत न बघता......
हजार प्रश्न मनात डोकावतात,
पाहिलं कोण बोलणार हा प्रश्न ?

तो सराईत पणे विषय हाताळतो
पाहिलं वाक्य तू संदीप खरेंची गाणी ऐकली आहेत
ती मानेनेच नकार देते......
तो तिला संदीप खरेंची साँग देतो.....

लागते अनाम ओढ श्वासाना.....
येत असे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना

ती भेट संदीप खरेंच्या गाण्यावर
संपते कि चालू होते ???

तीही ते गाणे रोज ऐकते......त्यातील तीच आवडत कडव

मी असा जरी नीजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना...

तिला त्याची खूप खूप आठवण येते
तिचा त्याला massage जातो

I miss u .........माहित नाही का?

I Love You... I Love You...||२||

तीन शब्दांत, एका दमात....
बोलून जातो मी...
एक या जीवनात, एक या मिलनात...
बोलून जातो मी...
I Love You... I Love You...||धृ||
तुझे ते हसणे सखे.. तुझे ते लाजणे..
तुझे ते हसणे सखे.. तुझे ते लाजणे..
तुझ्या प्रीतीची ओढ ती.. हरखून जाई मी...
I Love You... I Love You...||१||
तू आलीस सामोरी, तू गेलीस निघुनी..(२ वेळा)
तुझी तसबीर ठेवून हृदयाजवळ, आळवीत ते शब्द मी..
I Love You... I Love You...||२||
साजणी अशी तू कशी, झुरवी मला सारखी..(२ वेळा)
माझ्या मनीची स्पंदने, जाणवू तुला मी कशी..
I Love You... I Love You...
गंध प्रेमाचा, गंध तुझ्या ओढीचा दरवळे मनी माझ्या..(२ वेळा)
प्रश्न अनेक, रात्री अनेक, तुझीच स्वप्ने ती एकच नयनी माझ्या..
I Love You... I Love You...||३||
तीन शब्दांत, एका दमात....
बोलून जातो मी...
एक या जीवनात, एक या मिलनात...
बोलून जातो मी...
I Love You... I Love You.

मनीच्या शिंपल्याला प्रतीक्षा २ थेंबांची

आठवतंय का सख्ये खांद्यावर
डोक ठेवून तुज ते निजण
अन तुज निजण पाहून
मी हळूच स्वप्नात जाण




मनीच्या शिंपल्याला प्रतीक्षा २ थेंबांची
पण थेंब नसतील ते असतील २ अश्रू,
प्राक्तन हेचं जिथे हरला प्रीतीचा हर उपाय
पावसापारी आता भिजवतील दु:खाश्रू..!!

नजरा नजर ... क्लिअर आपली लाईन

लगन सराई
बायको अन साई
मेंदी मुरेल...
सासरा अन सासूबाई

लायटावाली छत्री
घोडी,वाजंत्री
पेल कोणी.. बिन पेल
थंड दारू.. संत्री

फटाके रंगीत
सनई संगीत
अत्तर दरवळ ...
मंत्रावाला पंडित

नवरी -नवरदेव
भजे, बुंदी, शेव
अक्षद टाकून ....
पंगत सोडून बुफेत जेव

नवरीची बहिण
लिपस्टिक मैत्रीण
नजरा नजर ...
क्लिअर आपली लाईन

निघाची घाई
झाली बिदाई
मिशन-ए-लगीन
सुरु लगीन सराई

फटाके रंगीत सनई संगीत

फटाके रंगीत
सनई संगीत
अत्तर दरवळ ...
मंत्रावाला पंडित

नवरी -नवरदेव
भजे, बुंदी, शेव
अक्षद टाकून ....
पंगत सोडून बुफेत जेव

नवरीची बहिण
लिपस्टिक मैत्रीण
नजरा नजर ...
क्लिअर आपली लाईन

दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी

दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी

तुझी भेट व्हावी तरी न थेट व्हावी
दादर,बोरीवली कधी चर्च गेट व्हावी

बागेत उभा मी तू पुन्हा थोडी लेट यावी
मग पापणी तुझी उगाच वेट व्हावी

कारणे अशीही दाखविता तू मंजुळा
तापलेली जिव्हा माझी चेक मेट व्हावी

गुलाब दमलेला मग तुझ्या पुढ्यात ठेवावा
वाया गेलेली वेळ ती पुन्हा सेट व्हावी

हळुवार स्पंदने ती बोईंग किवा जेट व्हावी
तुझी भेट व्हावी अशी तुझ्या माझ्यात ग्रेट व्हावी

स्वप्न आणि सत्य ,, यामध्ये फक्त एकच रेषा..

स्वप्न आणि सत्य ,,
यामध्ये फक्त एकच रेषा..
सत्य म्हणजे वस्तूस्थिती,,
अन स्वप्न म्हणजे असीम आशा..


छुन छुन करीत पैजण तुझे....
सैर वैर घुमले अंगण...
तुझ्या बोबड्या स्वरांनी... आठवले माझे बालपण...


ओठावरचा तील तुझ्या..
मोहून घेतो मजला...
स्पर्श करण्यास त्यास..
माझा ओठ हि आतुरलेला..

निघूनी कधी तू गेलीस ना

निघूनी जरी तू गेलीस ना
मन हळवे
मन हळवे
तुज आठवणे सोडे ना
निघूनी जरी तू गेलीस ना

फुलवला जिथे तू मोगरा
सुगंधिले कधी ज्या कळ्या
गंध अजूनी देतात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

गायला जिथे तू मारवा
छेडल्या कधी ज्या तारा
गीत अजूनी गातात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

स्पर्शिले जिथे तू देहा
चुंबिले कधी ज्या ओठा
थर्रथर अजूनी होतात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

घेतला जिथे तू विसावा
मळल्या कधी ज्या वाटा
वाट अजूनी बघतात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

उरल्या मनी आठव तुझ्या
त्याच आता सखी माझ्या
संग अशी करतात ना
जशी..
निघूनी कधी तू गेलीस ना

त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..

संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?

मिठीतला स्वर्ग अनुभवायला सये

मिठीतला स्वर्ग अनुभवायला सये
मला तुझ्या मिठीत यावंसं वाटतं
पण या जालीम लोकांच्या दुनियेत
यांच्याच कायद्याने राहावं लागतं...

कांटों के दिए ज़ख्म तो भर जाते हैं जल्दी ;

कांटों के दिए ज़ख्म तो भर जाते हैं जल्दी ;
जो मिला करते फूलों से ,उन्हें नासूर कहते हैं .
जिगर पे ज़ख्म होता है ,कलम से खून बहता है ;
जहाँ शायर की हो खेती ,मोहब्बत उसको कहते हैं.

मी सुखी होईन, जर तु माझाच झालास तर..!"

तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल, जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काहीतरी नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील एकदाच म्हणलास जर...
"मी सुखी होईन, जर तु माझाच झालास तर..!"

ज्यांना तुमच्या अश्रूंची किमंत कळत नाही

प्रत्येक शहाण्या मनात..
एक वेडा लपलेला असतो..
शहानपण संपले की..
वेडांचा बाजार भरतो


ज्यांना तुमच्या अश्रूंची किमंत कळत नाही , त्यांच्या साठी रडू नका .आणि
..........ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही .

....ज्यांना तुमच्या अश्रूंची किमंत कळत नाही , त्यांच्या साठी रडू नका .आणि
..........ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही .

मी एक थेंब.. तुझ्या डोळ्यात सजलेला माझ्यासाठी..

कमनीय तुझी कंबर
पाहुनिया शरमिंदा अंबर
जीवाची होतेय तगमग अशी
लगबग चालतेस तू अशी



मी एक थेंब.. तुझ्या डोळ्यात सजलेला माझ्यासाठी..

मी एक थेंब... तुझ्या डोळ्यात सजलेला माझ्यासाठी..
मी एक थेंब.. माझ्या पापण्यावर आलेला तूझ्यासाठी..
मी एक थेंब.. रिम झिम पावसात बरसलेला तुला फ़ुलविण्यासाठी...
मी एक थेंब.. साठलेल्या डबक्यातुन ऊडालेला तूला पाहण्यासाठी..

प्रेम तुझं मनात... प्रेम तुझं श्वासात...

प्रेम तुझं मनात...
प्रेम तुझं श्वासात...
प्रेम तुझं भिनलाय आता...
माझ्या नसा नसात...




रदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

झालो थोडा वीर धरला थोडा धीर

झालो थोडा वीर
धरला थोडा धीर

तडक धरली वाट
तिच्या घरची घाट

दारातच बसलेला पाहून तिचा बाप डोळ्यानेच घेतलं त्याच्या पोटाच माप
सरळ मागितला हात
प्रतिउत्तर म्हणून मिळाली लाथ

तरी काही बाधलो नाही
त्यास काही वदलो नाही

सरळ तिथून निघालो
आत्ता दुसरीच्या मागे नंबर लावतो

जीव लावून गमावणे हा तर प्रेमाचा नियम

जीव लावून गमावणे हा तर प्रेमाचा नियम
पण त्या समर्पनातही असते वेगळीचं मजा,
प्रेमाची परिणीती सुख दु:खात होतंच राहते
पण दोन्हीही अनुभवण्यासारखा आनंद नाही दुजा..!!

स्वतःच्या हाताने जीव माझा कवटाळला होतास

स्वतःच्या हाताने जीव माझा कवटाळला होतास
कशासाठी हे विचारायची आज आणली आहेस तू वेळ,
सराईत झालीस माझ्या जीव ओवाळण्याच्या नादात
मन भरल्यासारखं बादचं केलास ग तू प्रीतीचा खेळ..!

"ladies first ladies first"

आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या

बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात

गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट

सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला

यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात

पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले

सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही

म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे
"ladies first ladies first"
Not in salawar
but only in mini skirt

मैत्री....

मैत्री....
नको फुलासारखी , शंभर सुगंध देणारी...
...
नको सूर्यासारखी, सतत तापलेली...

नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देनारी ...

नको सावली सारखी, सतत पाठलाग करणारी ...

मैत्री ...

हवी अश्रूंसारखी, सुख दुखात समान साथ देणारी ...

जशी तुझी न माझी...!!!!!

मी आहे हा असा आहे,

मी आहे
हा असा आहे,
पटले तर घ्या
नाहीतर सोडून
द्या...

अगदी
एखाद्या
कवीतेसारखा,
आवडली तर ऐका
नहितर नीघून
जा...

कुणालही
सांगणार नाही,जबरद्स्ती
तर मुळीच नाही,
समजले पटले
तर करा नाहीतर
विसरून जा...

तुम्ही
जगताय ते
योग्य अन् मझ
जगण अयोग्य,
जरा असही
जगून बघा
निश्फळ वाटल
तर नावं ठेवा...

तुमच्या
आध्यात ना
मध्यात ना मझा
कुणाला त्रास,
कशाला उगीच
वैतागताय
कशाला उगीच
सन्ताप्ताय...

करावस वाटलं
तर एकच् करा
मी जगतोय तस
मला जगू द्या...
का नवं ठेवता
उगाच
मी करतोय ते
मला करु द्या...
म्हणूनच
म्हणतो..

मी आहे हा
असा आहे,
पटले तर घ्या
नाहीतर सोडून
द्या...

तुझ्या माझ्यातले आता

तुझ्या माझ्यातले आता..
अंतर जरी वाढलेले..
तरी मन तुझे माझे..
एकमेकात आहे गुंतलेले...

खूप हळवा तुझ्या आठवणींमुळे...

आज परत एकदा, मी..
खूप हळवा तुझ्या आठवणींमुळे...
हरवलो होतो भूतकाळात.
सगळ कसं डोळ्यांसमोरून चाललं होतं..
जणू काही आत्ताच घडतंय !!
जाणवले तुझे स्पर्श,
डबडबलेली नजर तुझी आठवली
अन् टचकन माझ्याच डोळ्यातून थेंब ओघळला...
टिपला मी तो, वेचलेल्या क्षणांसारखा...
कोरडे हसू येते मला, कि किती दिवस झाले कोण जाणे.... मान खाली घालून जगण्याला..!!
रात्र झाली ना कि वेड्यासारखे होते बघ
गलबलते, चढणाऱ्या रात्री बरोबर...
चांगले क्षण आठवतात,
जे आता गळून पडले आहेत सुकलेल्या पानांसारखे..
सगळं थांबलं आहे आज...,
जेव्हा तुझ्या आठवणी सुटल्या, माझ्या कुठल्यातरी मनातल्या खोल वाटेवरून.
जी वाट हरवली होती, काळाच्या जंगलात..
मुरली होती पावसाच्या पाण्यासारखी...
जिथे दोन्ही बाजूंना तुझी गर्द राई होती..
आणि तुझ्या प्रेमाच्या हिरवळीचा गारवा..
जो आत्ताच्या बोचणाऱ्या एकाकी गरव्या सारखा नव्हता कधीच... नुसता कोरडा हा गारवा ग..!!
आज परत एकदा
तू दाटून आलीस ढगांसारखी
बरसुनी डोळ्यांतून.... बेधुंद होऊन..
सगळं सरलं, नुसत्या जखमा उरल्या मागे..
फुंकर घालण्यासाठी....
आज परत एकदा..
परत एकदा......!!!

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय ?
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तिला पाहण्यासाठी दिवसभर तळमळायचे
ती जवळ आली कि दूरवर पळायचे
पळकुटेपणाला या काय प्रेमाचे म्हणतात पाय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

तिने काही दिले तर(?) सर्व काही बरे असते
नाही दिले तर मात्र त्या प्रेमाचे काही खरे नसते ?
प्रेमभांगाशिवाय मग त्यांच्या समोर नसतो पर्याय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

मिलानाशिवाय यांना दुसर काही दिसत नाही
प्रेमामध्ये यांच्या यांच्याशिवाय कोणी भिजत नाही
दोन मन जुळण्यासाठी मग सर्व जग विसरण्याचा पर्याय?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेमाला विरोध नाही माझा , नाही त्या भावनेला विरोध आहे
पण सर्व राहावे सुखी यासाठीच तर नेहमी त्या प्रेमाचा शोध आहे
पण आजकाल भरकटली प्रेमवाट आणि भरकटले पाय ?......
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेम म्हणजे कसे कृष्ण राधेसारखे असावं
त्याच्यामध्ये नेहमी त्याग आणि बलिदान दिसावं
आताच्या प्रेमामध्ये या दोघांची जणूकाही गरजच नाय ?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

ज्याला समजला अर्थ तो नेहमी सुखात जगेल
देवाजवळ नेहमी दुसरयाच सुख मागेल
ज्याला कळला अर्थ त्याचे आपोआप टळतील सर्व अपाय

याच्या पेक्षा प्रेमाचा दुसरा अर्थ तरी काय ?

प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?

प्रेम म्हणजे ? समजली तर भावना …..

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना …..
पाहिले तर नाते …
म्हणले तर शब्द …
वाटली तर मैत्री ....
...घेतली तर काळजी....
तुटले तर नशीब ….
पण मिळाले तर स्वर्ग....

जमलंच तर परत ये!!!

जमलंच तर परत ये!!!
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यास
ाठी तरी परत ये! साथ देऊ नको,
पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठ ी
तरी परत ये! महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठ
ी ...परत ये.....परत ये???????????????

अनओळ्ख्या हाकेला मी साद घालुन चुकलो,

अनओळ्ख्या हाकेला मी
साद घालुन चुकलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

एका आठ्वड्याच्या ओळखित
मी तिला आवडलो समजुन फसलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

फक्त दोन वेळ्चं फोनवरचं बोलणं
याला प्रेम समजुन बसलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

ती करत होती टाईमपास
तिला मी माझी खास समजुन चुकलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

का वागतात या मुली अशा
हा विचार करुन करुन थकलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

एका आठवड्याच्या प्रवासानंतर
पुन्हा मी एकटाच होतो,
रुसलेल्या माझ्या मनाला
कसेतरी समजावत होतो.

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात
तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...
आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही
जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...
ओल्या त्या पावसात मी चिंब...
मिठीत तुझ्या भिजलेले अंग...
तुझ्या श्वासात माझा श्वास...अन
पुन्हा पावसात भिजताना फक्त भास तुझा .
त्या भर पावसात
तुझी होती सोबत ...
म्हणून मी केली
थोडीशी गम्मत ..
तू आलास की,
पाऊस पड़ायचा ,

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
...
जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिने माझी तोंडची सिगारेट,ओढून फुन्कावी,
कधी तोंडी पान-विड्याची,पिचकारी थुन्कावी,
हि सगळी हिम्मत,फक्त माझ्या पुरतीच असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

मला फुलपाखरू आवडते

मला फुलपाखरू आवडते म्हणून मी त्याला माझ्या मुठीत बंद करून ठेवत नाही,
मला चंद्र आवडतो पण मी त्याचा हट्ट करत नाही.
तशीच तू हि मला आवडते, म्हणून तू माझ्या जवळ असावे अस नाही.
कारण तू कुठे असो तू मला आवडतेस आणि आवडतच राहणार.

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावरच्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही ,
कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा........!!!!

असंच राहू दे ना आपलं नातं

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!

द्यायचंच असेल तर देऊ
ओठांवर हसू, कधी उदास असू,
तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला
अशा आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

हिरव्या श्रावणातली मेंदी..

हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!

*मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......

मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........

इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!*

आनंदाला आता जास्त.. हृदयात जपता नाही येणार.

कडू गोड आठवणी तुझ्या...
मनात अजून हि फुलत आहेत..
तिथे त्यांना बहर येऊन...
हृदयात अजूनही झोका झुलत आहेत.


तू नाक मुरडायचे..
अन मी स्मित हास्याने स्वागत केलेले..
असे नाते आपले...
दोघांनी हृदयात जतन केलेले..


आनंदाला आता जास्त..
हृदयात जपता नाही येणार.....
कारण दु:ख कधी आघात करेल...
सांगता नाही येणार..


आता सतावतील काही...
माझ्या सोबतचे क्षण तुला..
जसे जागवत असतात ते..
रात्र भर मला..

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी.
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
...
जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जिने माझी तोंडची सिगारेट,ओढून फुन्कावी,
कधी तोंडी पान-विड्याची,पिचकारी थुन्कावी,
हि सगळी हिम्मत,फक्त माझ्या पुरतीच असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.

मैत्री ला एक वृक्ष म्हणू ..

मैत्री ला एक वृक्ष म्हणू ...मित्र सारे त्यावरली पाने फुले जणू
फांद्यांचा आधार घेऊ ......उंच वाढू मैत्रीची उंची पाहू

एक फुल तू बन एक पान मी
एक फांदी हाताची एक फांदी सहवासाची
घट्ट रोऊ पाळे मुळे या धर्तीत
मित्र बनवू तिलाही , नसेल भीती उखळून पडण्याची

भूक लागली तर उन खाऊ
वादळाला येवू दे सोबतीला आपण नको भिऊ
मैत्रीचे बळ बघ सारे मिळून अजमाऊ
संकटे येतीलही बहु संकटाना तोंड देऊ

घरटी बांधतील पक्षी अनेक
घरटा त्यात आपल मैत्रीच एक
निवास त्यांचा चिलबिलाट सारा
सर्वांनी मिळून सांभाळू हा मैत्रीचा पसारा

हिरवी पालवी मैत्रीची ,फुलोर हा मित्रांचा
बहरून जायील वृक्ष हे इथे खेळ भावनाचा
गंध पसरू चारी दिशांनी ,
बंध एक निराळ्या भाषांनी

पाहतील वाटसरू मैत्रीचे हे वृक्ष डोळे भरुनी
सांगतील किसे कधी ..तर लहान मुलांना अपुली मैत्रीची कहाणी
अशीच फुलुदे .अशीच वाढू दे निरंतर बांधून मैत्री राहील
बुंधा मजबूत आहे विश्वासाचा हे वृक्ष असेच वाढत राहील

आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी... जिने मला.. सावरले..

आणी हे माझ्या त्या मैत्रीनी साठी...
जिने मला.. सावरले..

तूझ्या शी कधी कशी..
गट्टी जमली कळलेच नाही..
माझ्या मनातील मैत्रीची जागा..
कधी भरली कळलेच नाही..
माझ्या प्रत्येक दु:खावर..
तुझ्या मैत्रीने घातलीस फूंकर..
मी आता मात्र मी कसे फेडू तुझे उपकार..

खरच एक मैत्रिण असावी..

खरच एक मैत्रिण असावी..
मी हसलो हि ती पण हसावी..
माझ्या डोळ्यातले अश्रु..
तिच्या डोळ्यातून वाहावे..
माझ्या मित्रांची गणती होताच..
तिनेही सामोरे यावे..

त्या वाटेवरच्या वळणावर...

त्या वाटेवरच्या वळणावर...

त्या वाटेवरच्या वळणावर...
एकदा उभे राहून वाट पहा..
मी येणारया त्या रस्त्यावर..
एकदा डोळे रोखून उभी राहा..

असतील माझ्या डोळे..
अश्रुंनी भरलेले..
तुला पाहण्यासाठी..
नम्र अन आसूसलेले..

तुझ्या हाकेला..
कान माझे आतूर झाले..
तूला प्रेमाने पुकारायला..
ओठ माझे पुटपुटले..

पुन्हा त्या वळणावर..
येशील ना सखे..
पुन्हा तुझ्या बाहूत..
जकडून घेशील ना सखे..

तुझ्या भेटीची आता..
लागलीय मला आस..
तू खरचं आलीस..
की होत आहेत मला भास..

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

सुंदर आहेस तू ह्यात वादच नाही

चंद्र सुंदर आहेच
पण तुझ्या इतका नाही
चंद्रावरचे दऱ्या
तुझ्या खळी इतक्या गोड नाही....


सुंदर आहेस तू
ह्यात वादच नाही
तुझ्या प्रेमात मरून जगण्या पलीकडे
मला दुसरा नादाच नाही...

आज मला थोडे झिरपूदे..

तो ढग मला होऊदे
पाउस होऊन मला बरसूदे
मोकळी झालीस तू अनेक वेळा
आज मला थोडे झिरपूदे..


चंद्र बघता बघता सये
त्यावरचे डागही वेचतो
तुझ्या गुणांसोबत मी
तुझे दोषही पचवतो....

न संपणारे एखादे स्वप्न असावे,

न संपणारे एखादे स्वप्न असावे,
न बोलता ऐकू येतील असे शब्द असावे,
ग्रीष्मात पाऊस पाडतील असे ढग असावे,
आणि
न मागता आयुष्यभर साथ देतील असे मिञ असावेत...








सांगून तुला काय कळणार आहेत माझ्या मनाच्या भावना,
खोलवर झालीये जखम मलमही आता स्पर्श करण्या धजेना,
भळभळू देत ती अशीचं सखे नको व्यर्थ प्रयत्न उपचाराचा
अनुभवू दे हृदयाला माझ्या त्यातून उठणारी हरेक वेदना..!!

तलाश ए मोहोब्बत

धुन्दलेसे पन्नो पे जिन्दगीकी वो फसाने नहीं मिलते

.
हसिनावोको अब सवरने के बहाने नहीं मिलते
मैफिलोमे आखोसे आखोके पैमाने नहीं मिलते

.
सजना धजना कब का ठुकरा दिया है आयिनोने
शिकायत है की पहलेसे अब दीवाने नहीं मिलते

.
पिणेवाले बहला लेते है खुद को शराब-ए-खाव्ब से
क्या करे साकी अब दीदार-ए-मैखाने नहीं मिलते

.
चाँद सा चेहरा देखे एक जमाना कब का बीत गया
ईश्क के भीड़ में अब चेहरे जाने पहचाने नहीं मिलते

लिखा कुछ हाले-ए-दिल सुनाते थे मैफिलोमे कभी
धुन्दलेसे पन्नो पे जिन्दगीकी वो फसाने नहीं मिलते







तलाश ए मोहोब्बत
जो दफन इस जेहेन मे
हमदम, कभी आवाज न देना
छोड आये रुहतक तुम्हारी चमन मे

ती कशी ही का असेना... ती मला आवडते.

ती कशी ही का असेना... ती मला आवडते...
तिच्या प्रत्येक हरकतीला टिपतो मी...
तिलाही मी जवळचा वाटावा म्हणून झुरणारा मी.....
तिचा अबोला अन माझ्या हृदयाचा ठोका चुकावा...
ती हसली अन त्या हास्यात मी रमणारा..
आणि... ती आज समोर का नसेना... ती अन तीच माझ्या अंतरी उरते.

किती हळवा मी तुझ्या आठवणींने

देव तूच
अन दानवही
प्रश्न तूच
अन उत्तरही....




किती हळवा मी
तुझ्या आठवणींने
वाहिले सर्व तुला तरी
न रिता मी दुःखाने

हम इतनी मोहोब्बत कर सकते थे

हम इतनी मोहोब्बत कर सकते थे
ये जान हि न पाये..
सोचा न था इतने मोड हम कभी चल भी पाये
हर मोड पर मुसाफिर हजारो मिले थे,
छोड आये अफसाने हर एक मोड के वाहिपर
पर आप के मोड पर पताही नाही
कैसे हमारी रूह तक को छोड आये.......

जब भी कभी उस गलियोंसे गुजरता हूँ...

जब भी कभी उस गलियोंसे गुजरता हूँ...
उसकी आहट महसूस करता हूँ....
ख़ता यह हैं की जिस कश्मकश में हम उलझे रहें..
वादियोंसे होकर आसमां की ओर चलते पैरोंपर जुलुम उठाते रहें..
वह साहिबा हमसे रूबरू हो न सकी... हम तो तनहा ही रह गए....
वो हसीना हमें कभी समझ ही न पाई...और इश्क के जहर का लुफ्त भी हम उठा न पाए....
इश्क के जहर का लुफ्त भी हम उठा न पाए....-





खे है बहोत समुन्दर में आंसू बहाते यारो
बहोत कम है जो मोहब्बते ऐ साहिल पाते है
बहोत चलते है इश्क की राहो पर यहाँ
बहोत कम है जो मंजिले ऐ इश्क पाते है

स्वप्न पाहायला तु शिकवले स्वप्नात जगायला तु शिकवले

स्वप्न पाहायला तु शिकवले
स्वप्नात जगायला तु शिकवले
स्वप्न तोडुनी तु गेलीस
पण तुझ्या गोड आठवणी स्वप्न करुन
जगायला मी शिकलो...



शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

कवा कवा येते याद तुई सखे
जीव माया "डिंग डॉंग" होऊन जाते
कसं मुसं होते.लळकुंडी येतात डोये...
एवळ्यात...
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

खात पीत नाही बराबर आता मी
मले तुया बगेर नाही राहवत
पोट्ट्या तश्या लय हायेत गावत
पण मले कोणाच तोंड नाही पाहवत
बुढा नसते घरात बुढी डोस्क लई खाते
एवळ्यात....
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

मी अजिता बच्चन तू माई जया
विल्लन जमान्याले येत नाई दया
पिर्माचा आपल्या पाय हैप्पी एंडिंग होते
पोट्टे पाट्टे माई मजा घेऊन जाते
एवळ्यात ...
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून जाते

अभाया इतलं पिरेम आपलं वाया नाही जाणार
काई हो सखे मी तुया अन तू माई होणार
जिन्दगानी पाय कशी तुई माई परीकशा घेते
खोट्या पिर्माले पास अन खरयाले फेल करून देते
जहाज आपली पाय आता कशी कशी गोते खाते
एवळ्यात........
शेवंतीची बाली मले तुया निरोप देवून देते

मी हिरवा गार बरसलेल्या तुझ्या पावसाने

मी हिरवा गार
बरसलेल्या तुझ्या पावसाने
रेताड मी निवडूंग
शापित तुझ्या विरहाने....



तू गेल्यावर आता
एकटेपणाची भीती वाटत नाही
इतका भिनलाय एकटेपणा कि
माझी सावलीही सापडत नाही...


भरकटतो आपण जसे
नको ती वाट चालल्यावर
आयुष्यातून उठूही शकतो तसे
कोणाच्यातरी प्रेमात पडल्यावर...


विरहात वरुणाच्या फुटतो
बघ धरतीच्या मनी कंप .
असह्य होऊन मग होतो
पोटात तिच्या भूकंप.

प्रेमळ तुझी ती प्रीत मला मिळायला हवी ....

पौर्णिमेला उगवशील मनाच्या क्षितिजावर
वचन देऊन तू झाली होतीस सखे दृष्टीआड,
पालटत गेले दिवस अंधारासोबत प्रकाशाचेही
पण दुर्दैवाने उरली नाही प्रेमात तितकीशी चाड..!!



जगात आपल्या छोट्याशा
मला साथ तुझी हवी;
प्रेमळ तुझी ती प्रीत
मला मिळायला हवी ....

नाते

नाते'
हा एकच शब्द. तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो.
त्यावर 'विचार' करायला एक मिनिट.
ते समजावून सांगायला एक तास.
समजून घ्यायला एक दिवस. जाणून घ्यायला एक आठवडा आणि निभवायला एक 'जन्म'

प्रशंसा तूझी करताना..तू..

कधी कधी माझेच शब्द..
माझ्या विरूद्ध वागतात..
तुला विसराचे म्हतले तरी..
तुझ्या विषयीच बोलतात




प्रशंसा तूझी करताना..तू..
शांत तूझी छबी साकार होते..
तशी तू ही त्या छबीत..
हुबेहूब आकार घेतेस..




अजून ही डोळे लावून आहे..
तू येणारया वाटेने..
की धावतेय रे मी त्या..
मृगजळाच्या दिशेने..