मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

प्रवासात सगळेच अनोळखी असतात ...!

प्रवासात सगळेच अनोळखी असतात ...!

म्हणून प्रवास टाळायचा नसतो ..

कारण त्यातला एक प्रवाशी ..

आपल्यासाठी थांबलेला असतो ...

जीवनात सगळंच मिळत नाही ..

म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो ...

कुठल्यातरी वळणावर आपली वाट पाहणाराहि असतो ..

एखाद्याला आपलं करता आलं नाही ..

म्हणून जीव जाळायचा नसतो ...

जीवनाचं संपल्यावर आपण त्या व्यक्तीच्या सहवासालाही मुकतो ..

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात ...

म्हणूनच माणसे उमलतात आणि फुले कोमेजतात ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा