मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

जीव तो अजाण विचारे ह्या जीवाला

खट्याळ अदा अन सोनमुखडा भरीचा बावनकशी भासते
अधीर लोण्याला आपसूक सुलगलेल्या निखाऱ्याकडे खेचत नेते,
माझ्यावरची भिरभिरती नजर मग का ग जमिनीवर खिळते,
अंगार इष्काचा भडकवून सजणे अशी कशी लाज आडवी येते..!!



म्हणे सखी लिही शब्दात प्रेमाला
मी क्षणात पुढे तिच्या ठेवले मनाला

भांबावली थोडी म्हणे वाचू कशी मी ?
जीव तो अजाण विचारे ह्या जीवाला

स्तब्ध होवुनी गाळले तिने आसवाला
जे न कळले कुणा,कळले त्या डोळ्याला

प्रेम हृदयातील एक भावना

प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभरलपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. .
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना...
जग बदलणारी...
जग चालवणारी..

एक थकलेलं शरीर ....

एक थकलेलं शरीर ....
एका उंच ठिकाणी ध्यानास्थ बसलेलं......
असंख्य स्वप्नांना टीप पडलेल्या डोळ्यात जिवंत ठेवत.....
काही तरुण देहं उदयाच्या स्वप्नान साठी त्यासमोर जागी होवून उभी.....
सळ सळत्या रक्ताला आज दिशा मिळावी वाहण्यासाठी,रसत्यावर सांडण्या पेकषा....
आकाशालाही हेवा वाटत असवा आज उडणार्या जिवंत तीन रंगांचा ...
त्या महात्म्याच्या पांढऱ्या टोपीत जादू असावी बहुदा....
त्या पोटानसाठी पोटाची लढाई छेडली......
सुरकुत्या पडलेल्या देहाने .....
पापाला ओरबाडून काढावं आणि ओढत न्यावं....
दाग नसलेल्या मनुश्यांच्या वसतीत पुण्य बघण्यासाठी....
कातलेल्या सुताने उधळलेला पैशाचा माज,विचारांनी बांधण्यासाठी...
आपल्याच हक्काच्या घरातील अंधार कोरून त्यावर शुभ्र प्रकाश गोन्दन्यासाठी ...
सामान्य मनाच्या गाभाऱ्यात कधीची तेवत असलेली ती पणती...
आज लखः उजळतेय चहू दिशानी बिनधास्त बेधडक..
त्या तलवारी जंगून पडल्यात म्यानीत....
त्या लाठ्या मोडून पडल्यात....
हा "चमत्कार"नाही ...
......हे हत्यार आहे नवे... तुमच्या आमच्यासाठी ..............
......नको त्या अन्यायाला न्यायाने चिरडण्यासाठी ..........
.....एका महात्म्याचे स्वप्न पुन्हा साकारण्यासाठी ...........

एक थकलेलं शरीर ....

एक थकलेलं शरीर ....
एका उंच ठिकाणी ध्यानास्थ बसलेलं......
असंख्य स्वप्नांना टीप पडलेल्या डोळ्यात जिवंत ठेवत.....
काही तरुण देहं उदयाच्या स्वप्नान साठी त्यासमोर जागी होवून उभी.....
सळ सळत्या रक्ताला आज दिशा मिळावी वाहण्यासाठी,रसत्यावर सांडण्या पेकषा....
आकाशालाही हेवा वाटत असवा आज उडणार्या जिवंत तीन रंगांचा ...
त्या महात्म्याच्या पांढऱ्या टोपीत जादू असावी बहुदा....
त्या पोटानसाठी पोटाची लढाई छेडली......
सुरकुत्या पडलेल्या देहाने .....
पापाला ओरबाडून काढावं आणि ओढत न्यावं....
दाग नसलेल्या मनुश्यांच्या वसतीत पुण्य बघण्यासाठी....
कातलेल्या सुताने उधळलेला पैशाचा माज,विचारांनी बांधण्यासाठी...
आपल्याच हक्काच्या घरातील अंधार कोरून त्यावर शुभ्र प्रकाश गोन्दन्यासाठी ...
सामान्य मनाच्या गाभाऱ्यात कधीची तेवत असलेली ती पणती...
आज लखः उजळतेय चहू दिशानी बिनधास्त बेधडक..
त्या तलवारी जंगून पडल्यात म्यानीत....
त्या लाठ्या मोडून पडल्यात....
हा "चमत्कार"नाही ...
......हे हत्यार आहे नवे... तुमच्या आमच्यासाठी ..............
......नको त्या अन्यायाला न्यायाने चिरडण्यासाठी ..........
.....एका महात्म्याचे स्वप्न पुन्हा साकारण्यासाठी .

आठवतात मला ते जुने प्रेमाचे क्षण,

आठवतात मला ते जुने प्रेमाचे क्षण,
तुला विसरता मात्र येत नाही ,
सगळ काही करून बघितले ...
साली हि सवय काही सुटत नाही .


प्रेम जिच्या वर केले होते
मोह तिच्या वर जडला होता ,
नंतर माहित पडले
माझ्या आधी तिला दुसराच कोणी घेऊन गेला होता ....

जाता जाता पटकन निघून गेलीस,

जाता जाता पटकन निघून गेलीस,
माघे फिरकुन सुधा पाहिले नाहीस,
येते परत असे म्हणायचे राहून गेले
माझे डोळे तुलाच पाहत राहिले
पण परत तू कही आलीच नाहीस.....

आठवले ते आपले जूने दिवस की
मन माझे बेधुंद होउन बसते
ह्यातून बाहेर पडताना एवढी धडपड होते की
जग माझ्या कड़े पाहून हसत असते..

मनी भेटीची ओढ होती सख्या सोबत ,पावसाची सर होती .

मी सांगणार आहे माझ्या मनाला

तू चोरून येतोस ,मला भेटायला .

बघितलच कुणी सख्या तुला ,तर

जातोस पापण्यांच्या आड लपायला !!!!!


मनी भेटीची ओढ होती
सख्या सोबत ,पावसाची सर होती .
दोघांनी पाहिलेली स्वप्नेसुद्धा
दोन पावले आपल्या पुढेच होती.

वाटेतली फुलेसुद्धा सख्या
तुडवत काट्यांना येत होती.
नकळत का होईना पण
मध्येच डोकावून पाहत होती.

रात्रीनंतर पहाट आणि पुन्हा रात्र
रोजच सख्या होत होती.
पण येता जाता दुपारही
रोज चांदण उधळत होती !!!

अशाच सख्या गंधित अंगणी
प्रीती आपली फुलत होती .
वरून किरणे रात्रीही
ओंजळीतून मोती उधळत होती !!!!!!!!!!

विसरलीस जरी मला तू काय होता माझा गुन्हा

विसरलीस जरी मला तू
काय होता माझा गुन्हा
दूर देशी जरी गेलीस तू
आठवांचे अश्रू येतील पुन्हा पुन्हा !!!



सुखाच्या रस्त्यावर नेहमीच..
दुखाचा स्पिड ब्रेकर असतो..
चांगला चालक तोच असतो..
जो तो स्पिड्ब्रेकर आनंदात पार करतो..



प्रेमात हारुन सुध्दा

प्रेमात हारुन सुध्दा
आज जिकलो आहे...
कारण तिच्या मनात
कुठेतरी जागा करुन गेलो आहे...

येतात काही अनोळखी माणसा जीवनात...

सायंकाळचा पाऊस...
धूंद धूंद होऊन बरसतो..
जसा काही त्याचा "थेंब"..
जमिनीला भेटण्यास तरसतो..

येतात काही अनोळखी माणसा जीवनात...
अडकतो कधी आपण हि मग मैत्री च्या बंधनात...!!
असा एक दिवस येतो, भेटायची ओढ वाढवतो....
रोजचे भेटणे मग, सहवासचा आनंद मिळवतो....!!
काही दिवस ठीक, नंतर मात्र कंटाळतो....
...काही करणे काढून मग एकमेकांना टाळतो....!!
प्रत्येकाला असा एखादा तरी अनुभव येतो...
पण खरा सांगा, कुणी मित्र बनवणे कधी का सोडतो ...??

धूंद पावसाळी ती संध्याकाळ..
हातात तूझा हात होता..
छत्री असूनही तूझा स्पर्श..
मला चिंब भिजवत होता..

पहाऱ्यास त्या नभाच्या ठेवुनी चंद्र चांदणीला

पहाऱ्यास त्या नभाच्या ठेवुनी चंद्र चांदणीला
दिव्यास त्या राहू दे जागे.. आहे अंधार सोबतीला
हा काजवा कुणाचा कि नयनी स्वप्न ते लुकलुकते
हळूच फुलत्या रातराणीस मिळे वारा तो जोडीला


हि नदी का वेडी चालते वाकडी.. कळे ना कुणाला
तो गंध तुझा दिवाना मोगारयास सोडून पळाला
ते दव जमले पहा तिथे पानावरती तुला भेटण्या
पाहून प्रतिबिंब चंद्राचे म्हणे मज मोती मिळाला

कधी आपलेच शब्द.. आपली थट्टा करतात..

कधी आपलेच शब्द..
आपली थट्टा करतात..
तर कधी भावना विवश होऊन..
ते आपले मन घट्ट करतात..



विस्कटलेल्या नात्याला..
आता जकडतोय बंधनात..
पुन्हा एकदा येईल का..?
नाद त्याचा या स्पंदनात..



मी तुला तुझ्या नावाने पुकारावे,
तुला खुप वाटायचे.
अन तुझं नाव माझ्या कडून ऎकून..
तुझ्या ओठावर हसू दाटायचे..



कधी आपलेच शब्द..
आपली थट्टा करतात..
तर कधी भावना विवश होऊन..
ते आपले मन घट्ट करतात..

फुलाने राहावे फुलत.. झोक्याने राहावे झुलत..

माझा प्रत्येक श्वास...
तुझीच गाणी गात आहे..
माझा प्रत्येक शब्द...
तुझीच कहाणी सांगत आहे..


प्रत्येक शब्द हा असा असावा..
कि समोरच्याने वाचताच काळजात घुसावं..
त्याला धार असावी...
पण.. काळीज घायाल न व्हावं..


जागतो हा थेंब रात्र रात्र..
सकाळ प्रहरची वाट पाहात..
सकाळ होताच हा मग..
दवबिंदू होण्याच्या नादात..

फुलाने राहावे फुलत..
झोक्याने राहावे झुलत..
मौल्यवान हे आयुष्य गड्या..
त्याला जागावं हसतं खेळतं

आयुष्य सार बेरंग असताना

कडक उन्हात दिवसा उजेडी
अचानक पडावं जस चांदण,सख्या
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर!!!!!!

निरभ्र आकाशात ढग नसताना
अचानक यावी सर एखादी ,सख्या
तसं वाटल,तू dear म्हंटल्यावर !!!!!!!!!

आयुष्य सार बेरंग असताना
अचानक उमटावा इंद्रधनू जसा ,सख्या
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर !!!!!!!!!!!

उगवतीला अचानक चंद्राने याव
आणि सूर्याने याव रात्री सख्या
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर !!!!!!!!!!!!!

चातकाला लागावी तहान सख्या
अन वलीवाने याव अवेळी अचानक
तसं वाटल तू dear म्हंटल्यावर!!!!!!!!!!!

चंद्राच्या प्रेकाशाने.. उजळल्या दाही दिशा..

घडून गेलेले क्षण कधी..
पुसले जात नाहीत..
स्वत:च सावरावे स्वत:ला..
थेंबभर पाण्याने काही डाग पुसले जात नाहीत..



आजही त्या वाटा..
तश्याच आहेत रस्त्यावरच्या..
बदलली ती माणसे..
कुणी इकडच्या टोकाला तर कुणी तिकडच्या.


चंद्राच्या प्रेकाशाने..
उजळल्या दाही दिशा..
चांदण्याही त्याच्या संगे.
सुशोभित करतात निशा..



नावात सामावून माझ्या..
हृद्यात राहू लागलीस..
दुर जरी गेलीस तरी..
नावात तशीच राहीलीस..


तुझं नाव माझ्या नावात...
अखेर पर्यंत जपलेले असेल..
तु कितीही अट्टाहास केलास..
तरी ते माझ्या नावातच लपलेले दिसेल..


मलाही वाटत होतं..
माझं नावं तुझ्या नावापूढे असावं..
अन तऊ त्याला..
जिवापाड जपावं..


हरला आणि जिँकला एवढच यशाच माप नसतं,
प्रयत्नांना त्याहून जास्त महत्व असत.

प्रयत्नांची कधी हार आणि जीत नसते,
म्हणून जिँकल्यावर ज्याने प्रयत्न सोडले तो हरला
व हारूनही ज्याने प्रयत्न नाही सोडले तो जिँकला.

तुझ्या माझ्या नात्याचे.. हे रेशमी बंध..

कोसळणारा पाऊस असावा
अन संगतीला असावी तू,
हिरव्यागार साथीसोबत
जाईल आपली प्रीतीही उतू..!!



मैत्री म्हणजे प्रेम..
मैत्री म्हणजे विश्वास...
मैत्री म्हणजे तुझा अन माझा..
मिसळलेला एक श्वास..



तू माझी मैत्रीण..
अन मी तुझा मित्र..
असेच चालत राहो..
आपल्या नात्याचे हे सूत्र..


तुझ्या माझ्या नात्याचे..
हे रेशमी बंध..
येऊ दे ना या नात्याला..
मैत्रीचा सुगंध..


दरवरल्या दाही दिशा..
आपल्या प्रेमाच्या सुगंधात..
आपण दोघेही अडकलोय..
या सुंदर अश्या बंधनात..

एक नाते असत प्रेमाच,

एक नाते असत प्रेमाच,
एक नाते असत मैत्रीचे,
फ़रक असतो फ़क्त भावनांत .
प्रेम हे प्रेमाचा जागय व्रत असत,
पण .........!!!!!!!

मैत्रीचे नाते नकळ्त कधी,
प्रेमात बदलते कळ्तच नाही?

हा खेळ असतो फ़क्त भावनांत .!!
मग यता दोष कोनाचा????????

प्रेमाचा.....का ......मैत्रीचा......का ...
मनाचा???
मला पण मन आहे,
मला पण भावनां,

आजकाल च्या मुलीसाठी..

आजकाल च्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
आणि BF ला मिस कॉल देते एक रूपया बैलेंन्स राखून..


फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)

पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..

दुसरा : बोला.

पहिला : देशपांडे आहेत का ?

दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!

पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.

कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,

बासूरीच्या सुरांनी..
भान राधेचे हरपले..
कृष्णाच्या प्रेमासाठी..
मीराने स्वत:ला झोकून दिले..



मला ही वाटले होते..
तुझ्या सवे मरावे..
मरणे तर सोड ग..
तुला जगताही नाही आले..


तूला कधीच कळले नाही..
मन माझे असा तुझा आरोप..
तु मला काहीच कळू दिले नाहीस..
असा माझा ही प्रत्यारोप..



कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,
तुझा माझ्या प्रेमाचा मग डाव रंगतो
विसर मनाला कितीदा मी सांगतो
ते ही हट्टी सारे सोडून त्यामागेच धावतो...

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.