रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या ,असं करावंसं वाटत !

तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या ,असं करावंसं वाटत !

आधीच गुंतलेल्या
शब्दांना माझ्या
तुझ्यातच विरून
जावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला.......

रात्रीचं चांदणं
चंद्राकडे मागून
दिवसाही सख्या
त्यांना उधळावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला ......

आभाळातून काळ्या
पावसाला चोरून
इंद्रधनुच्या रंगात
न्हावसं वाटतं
तू असतोस सोबतीला ..........
.
नजरेला माझ्या
उडायला सांगून
मनात तुझ्या रे
डोकावंसं वाटतं
तू असतोस सोबतीला ............
.
रात्रीला जागवणाऱ्या
डोळ्यातल्या स्वप्नांना
दिवसाही सख्या
बोलवावसं वाटतंय
तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या, असं करावस वाटतंय !!!!!

आधीच गुंतलेल्या
शब्दांना माझ्या
तुझ्यातच विरून
जावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला.......

रात्रीचं चांदणं
चंद्राकडे मागून
दिवसाही सख्या
त्यांना उधळावसं वाटतं !
तू असतोस सोबतीला ......

आभाळातून काळ्या
पावसाला चोरून
इंद्रधनुच्या रंगात
न्हावसं वाटतं
तू असतोस सोबतीला ..........
.
नजरेला माझ्या
उडायला सांगून
मनात तुझ्या रे
डोकावंसं वाटतं
तू असतोस सोबतीला ............
.
रात्रीला जागवणाऱ्या
डोळ्यातल्या स्वप्नांना
दिवसाही सख्या
बोलवावसं वाटतंय
तू असतोस सोबतीला, म्हणूनच सख्या, असं करावस वाटतंय !!!!!

कालच्या रातीला आवं भलतंच हो घडलं,

कालच्या रातीला आवं भलतंच हो घडलं,
कदी नव्ह ते दारात तिचं पाऊल पडलं..!!

लाजत मुरडत ठुमकत आली देखणी नार
नजर ठरना माझी आसं सोळा शिणगार..!!

आभाळातली अप्सराचं जणू परसन्न झाली,
मनातलं वळखून मला खेटून हो बसली..!!

मझ्याकडं बगून अशी हासली कल्लास,
आदीचं खुळा झालो मंग पुरता खल्लास..!!

हाळूचं कानात म्हटली मला "दिलाच्या दिलवरा",
तुमच्यासाटीचं केलाय बगा झ्याक ह्यो नखरा..!!

आवाज आयकून मोरपिसं काय अख्खा मोरचं फिरला,
पुढ्यात बसली ती जिच्यासाठी व्हता जीव झुरला..!!

नाजूक हाताची मिठी तिनं घातली जवा गळ्यात,
पिरतिचं पाखरू तवा धडपडू लागलं जाळ्यात..!!

मुका घ्याया तिचा केला म्या फुटक्या व्हटांचा चंबू,
रापकन हाणला तवाचं माझ्या आयन पेकाटात बांबू..!!

काय सांगू तऱ्हा राव...खरी नाय ती आली व्हती सपनात,
हात पिवळ करण्याचं कंदी यायचं आयसायबांच्या मनात..!!

मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही

मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही
मी शिक्षा करतील म्हणुनी, ती कधी उचलली नाही

भवताली दंगा चाले, तो शांतपणे बघताना,
कुणी हसता-खिदळताना, कुणी गाणी ही म्हणताना
मी निवांत वाचत बसलो, भूगोलाचे पुस्तक जेव्हा,
मज चिडवायाला देखील, पण कुणी डिवचले नाही

बेशिस्त वर्ग हा आहे, एकाहून वरचढ येथे
येताच परीक्षा जवळी, चोरुनी फाडती पाने
पण खिशात माझ्या कुठली, कॉपी वा चिट्ठी नाही
मी वळून पाहिले नाही, वा पाहू दिले नाही

धुतले न अजून मजला, मी खोडी न केली काही
निकालावर सजून दिसते, बाबांची लांबशी सही
मी मनात नाही भ्यालो, मी कुणास नाही भ्यालो
मी घरात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

कधी तरी विचार करतो

चुकलेला तो क्षण
आज हि चुकवतोय
प्रेत्यक कथा .......आसवाच्या
शब्दात मांडतोय



आम्ही तिरडी वर पडाव
लोकांनी चार असाव गाळाव
त्या असावच देन म्हणून
दहा दिवसांनी जेवणाचे बेत आखाव


फासावर लटकलेली पाहुनी
ती शय्या .. नक्कीच तो सुटला असेल
कि सुखाच्या शोधात तो असुनी
दुखाच्या गर्दीत तो विरला असेल



कधी तरी विचार करतो
व्यहारिक जगात मीच मारतो
देणे-घेणे लागू पडते सर्वना
तो मात्र जीव देण्यातच रमतो


अविरत चालण्याचा
प्रयास असा फसला
त्या वाटेवरच्या वळणावर
तिचा माझा हाथ अपुसकच सुटला

तुझ्या साठी वाहलेला प्रत्येक थेंब

तुझ्या साठी वाहलेला प्रत्येक थेंब....
मी जपून ठेवलाय मनाच्या गाभाऱ्यात...
हळूच येतो कधीकधी तो पापण्यांवर......
जेव्हा कधी आठवतो तुला एकांतात...



आनंदाचे डोहे फुटताना
अश्रूच्या सरीने वाहून यावे
नियती हा खेळ खेळताना
मी फ़क़्त मनन करावे

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .

मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .

चुकली दिशा तरीही आकश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे .

आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..

माकड हसले त्याच क्षणाला,

माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
पर दु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!
१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!
४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!
६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!
हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू नका देवू....!!!
!नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे क्षण

काही शब्द येतात ओठातून ukhane

मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे

निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान

काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून

भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !

*खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..*

उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम

पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला

मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

उखाणे नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी *

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप

*पाव शेर रवा पाव शेर खवा
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
*
*दही,साखर,तुप
...राव माला आवडतात खुप*
* *
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ

सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?

हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास

एक होति चिऊ, एक होता काऊ,
.. ना घास भरवला तर मि काय खाऊ?

लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि

केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत

*नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा*

*एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी
पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले
कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर
नाव कुणाच घेऊ . *
* *
दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ----रावाचि मि सौभाग्यवति.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
---- नाव घेते सौभाग्य माझे

श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

पोरीं वर बोलू काही......

पोरीं वर बोलू काही......
जरा चुकीचे... तरी बरोबर......
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......

"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

न जाने कौनसा मोड आखरी हो

न जाने कौनसा मोड आखरी हो
===============================

कल तक जिस राह पर चलते आये है
वो आज भी सुनी डगर है
कल भी कल की खबर नहीं थी
न आज कोई खबर है
सपने बहुत सजाये है
अरमानो के पंख लगाये है
तूफान के कश्ती फस भी जाये तो
इरादों के सैलाब को रोक नहीं पाए है
पर क्या पता इन्ते जो ख्वाब है
कब टूट कर बिखर जाये
ये जो चलती सास है
कब धड़कन अधूरी छुट जाये
कब जिंदगी हमसे नाता तोड़ दे
नहीं जानते इस सफ़र में कौनसा आखरी मोड़ है ........

जगजीत सिंग यांची एक गझल

जगजीत सिंग यांची एक गझल नक्की ऐका
(ठूकरावो के अब के प्यार करो.. मै नशे मे हु)}

"दारू" ....(कधी ब्याड कधी वायीट असते :))

मोरू,दारू कधी चागली कधी वायीट असते
चढणारी,झोंबणारी तर कधी लायीट असते

ती वाट पाहत कोरड्या गळ्यांची, गर्द होते
कधी ब्याड मोरनिग तर कधी गुड नायीट असते

नसातला प्रवास तिचा गार वार्याने वेग धरतो
आपल्याच सुताने कापलेली आपली कायीट असते

संत्रा,मोसंबी,कधी विलायती,नावात काय आहे
ज्याच्या त्याच्या परीने झेपलेली फायीट असते

परवाना प्राप्त जिभेला ते कुणी कायदे काय सांगावे
थेंब थेंब शोषनार्यांना सागराचे खुले परमिट असते

बंद भिंतीत,मंद प्रकाशात सुख-दुख साजरे होतात
निर्व्यसनी मताने 'ब्याड',पिणाऱ्याना ते रायीट असते

कुछ छोटे से ख्वाब है मेरे

कुछ छोटे से ख्वाब है मेरे
=======================
युही चलते हुए

परछाई को भी मै थामना चाहती हु

उस बहती हवा के रफ़्तार से उड़न चाहती हु

असमान को ज़मी से देखे ज़माने बीत रहे है

एक बार मै उसे अपने आगोश में भरना चाहती हु

आग के दरिया से तो आज भी डरता लगत है

उसी आग को अपने अरमानो के पंख बनाना चाहती हु

उन हसती कलिओ की खूबसूरती,

फूलो की खुशबू को अपने नूर में सजाना चाहती हु

चकता है जैसे सितारा असमान में

मै दुनिया की भीड़ में ऐसे ही जगमगाना चाहती हु

उस सूरज नज़र किसने मिलाली है आज तक

मै उसकी रौशनी से बाते करना चाहती हु

एक ख्वाइश है छोटी सी

एक अरमान है दिल

इरादों का दामन थाम कर

मै पंछी की बनती उड़ना चाहती हु..

मै ये जिन्दगी अपनी शर्तो पे जीना चाहती हु

भेटली होतीस एकदा... फ़क्त तुझ्या श्वासाने... milind

आजची ही रात्र वैरयाची...
सारेच रुसतात माझे साथी...
जे होते कधी सुख दुखात सोबत...
त्यांनीच तोडली आज सारी नाती.



माझे नाव तुझ्या...
नावा शिवाय अपुरे....
जसे तुझ्या शिवाय..
माझे हे जिवन अधुरे..


बहरुदे तुझे जिवन...
हेच माझे मागणे...
परत नको वळून पाहूस...
हेच तुला माझे सांगणे..


भेटली होतीस एकदा...
फ़क्त तुझ्या श्वासाने...
समोर तु येताच ...
तुझं कुंकु मध्ये आले...


जाणवतो मला अजुनही...
तुझा न झालेला स्पर्श....
अन त्या स्पर्शा मागील...
तुझ्या ओठावरील हर्ष..

मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर

मन -----

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

- बहीणाबाई चौधरी

एक नातं जोडताना आपण

एक नातं जोडताना आपण
किती नात्यांना दुरावतो
एकाच्या जवळ जाताना
दुसऱ्याला .....विसरतो !

उन्हात आपण असलो कि
सावलीला नुसतं आठवतो
पण सावलीत गेलं कि मात्र
उन्हाला झिडकारतो !

जमिनीवर असलो कि
आभाळाला घाबरतो
पण उंच उडताना मात्र
जमिनीला सोडतो !

जगताना आपण नेहमी
स्वप्नांमागे चालतो
पण स्वप्नात असलो कि मात्र
जगण्याला सुनावतो !

का असं होत असेल
हेही तुम्हाला सांगतो
माणूस म्हणून जगताना
आपण माणसालाच विसरतो !

असंच असतं...... तू हात हातात घेतलास कि मी

असंच असतं......
तू हात हातात
घेतलास कि मी
सोड सोड म्हणायचं ,
हवा असणारा
स्पर्श झाला कि
मोहरून जायचं !

असंच असतं .......
तू बोलत असताना
मी तुला एकटक
पाहत राहायचं ,
ते तुझ्या लक्षात आलं कि
मग मी लगेच नजरेला
दुसरीकडे वळवायचं !

असंच असतं.......
सर्दी होईल म्हणून
पावसात भिजायला
खोटं खोटं टाळायचं,
पण तू सोबत आलास कि
आणलेली छत्री मिटवून
तुझ्यासोबत भिजायचं !

असंच असतं........
रोज रात्री उगाच
झोपेचं सोंग घेऊन
सगळ्यांना फसवयाचं,
पण खोट्याच मिटलेल्या
त्या डोळ्यांनी गुपचूप
तुला स्वप्नात आणायचं !

असंच असतं ....
तुझ्यासमोर अबोल होणाऱ्या
लाजऱ्या माझ्या मनाला
एकांतात तुला भेटवायचं ,
आणि माझ्याही नकळत मग
तू पसरलेल्या मिठीत
स्वत :ला मिटून घ्यायचं !
असंच असतं ..................

कातरवेळी स्पर्शुनी गेली मंद वारयाची झुळूक,

आज माझ्या स्वप्नांना...
तु आपलेले करुन जा...
जाता जाता स्वप्नांना त्या...
मला प्रत्यक्षात देऊन जा..



एकदा भेटायचे आहे मला..
या चंद्र चांदण्यांना..
विचारायचयं रात्रीच का पसरवतात..
हा खेळ चांदण्यांचा..



कातरवेळी स्पर्शुनी गेली मंद वारयाची झुळूक,
मिसळूनी सारे रंग ते, गडद झाले आभाळ,
बरसुनी त्या वर्षाधारा, ओघळते थेंब ते टिपताना,
तुझ्या कांतीवरती ते खेळताना, आठवले ते दिवस,
माझ्या मिठीत मिळणारी उब, अन तुझ्या स्पर्शासाठी मी अधीर,
जमले नाही जे मला, तुला सहजच जमले,
प्रेम माझे एकाकी, ते तसेच कावरेबावरे,
कैक प्रयत्न करुनी, नाही शमले ते, विजल्या अनंत पणत्या,
उरल्या फक्त माझ्या प्रेमाच्या अनंत पाउलखुणा, गहीरया, पावसात भिजलेल्या,
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या,,

amol ghayal

पुन्हा .........मीच असेल ...

खूप वाट पहिली
अजून तो आलाच नाही
जगत होते खरी मी
पण श्वास काही चालला नाही ......




पुन्हा .........मीच असेल .........

पुन्हा तुझ्या विचारात .... मीच असेल
पाहशील जेव्हा स्वताला.... मीच दिसेल

दाटतील हुंदके,तू मोकळी रडशील कशी
डोळे जागतील माझ्यासाठी,रात्र घेयील कुशी
तू शोधशील स्वप्नात मला ,मी तिथे नसेल
रिकाम्या डोळ्यात मग पाणीच पाणी साचेल

कविता माझ्या तू पुन्हा पुन्हा वाचून काढशील
शब्द भरशील डोळ्यात आणि स्तब्ध रडशील
मग हळूच आठवणींच्या गर्दीत तुला एकट वाटेल
ऐन कोरड्या मनात तुझ्या . भेटीचं एक ढग दाटेल

एकटी असशील जेव्हा जेव्हा ..सोबत मीच असेल
दूर जाणाऱ्या वाटेवर ठेव पाऊल ...पलीकडे
...........................वाट पाहणारा हि मीच असेल

उद्या जेव्हा तू नसशील

उद्या जेव्हा तू नसशील
===============
जगते आयुष तुझ्या सोबतीने
क्षणाचा हि विचार नाही
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

आज हृद्य चे स्पंदन
तुला साद देतात
पापण्या ओलावल्या तरी हसतात
उद्या या हाकेला कोण होकार देणार
पापण्यांचे ओझे कसे हलके होणार
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

तुझ्या स्पर्श नि मी रोमांचित होते
तुझ्या गोड आठवणीत दिवस रात्र सरते
उद्या फक्त आठवांचे काळे ढग येतील
मनसोक्त बरसतील तरी उणीव राहील
सरीच्या रुपात तुझे दुख वाहील
प्रत्येक थेंब फक्त तुला पाहिलं
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

आज जागते तुझ्या सवे
मी गुतले श्वास तुझ्या श्वासात
उद्या कसे कुणाला तो श्वास मोहरून जाईल
कसे त्या स्पर्शाला माझे मन बरवून घेईल
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

भरलं होतं सख्या आभाळ माझही

भरलं होतं सख्या आभाळ माझही
म्हणून तर पावसाला मी यायला सांगितल
विरहाचं गीत त्याला थांबवायला सांगून
आठ्वणींच गाठोडं खोलायला सांगितल !

पावसाने मला एकदा विचारल होतं,

कवितेत काल ज्याला
होता जपला
तोच चंद्र आज
काळ्या ढगांत लपला
रागाने त्याच्या
वीज हि चिडली
नभी नाही चंद्र म्हणून
चांदणी हि रडली



पावसाने मला एकदा विचारल होतं,
तुला कोणासोबत जगायला आवडेल?
मी पण त्याला सहजच विचारलं,
मला एकटीला तुला भिजवायला आवडेल ?

तू मला आभाळ दाखवलस,

खिडकीतून बोट करून
तू मला आभाळ दाखवलस,
...भरलेलं ...
पण ते तर माझ्याकडे
आधीपासूनच होतं ..
तेही तूच दिलेलं ...
ते रितं का करत नाहीस
म्हणून तू मला विचारलस .
पण ते रितं झाल्यावर
माझ्याजवळ कांही
उरतंच नाही ..
हे तू सोयीस्कर विसरलस!

मृत्यूस दाद देवून गेले.....

मृत्यूस दाद देवून गेले.....

पुरावे तिथले सारे ते मिटवून गेले
मृत्यूस माझ्या अपघात पटवून गेले

लेखणीत शब्द काही रक्तबंबाळ होते
आंधळे,बघ्याची भूमिका वठवून गेले

भिनभिणत्या ओळी प्रतेक्ष्य दर्शी होत्या
खऱ्या कवितेसही ते खोटे वदवून गेले

ओठात मिळाल्या अर्धवट चार ओळी
अंधारात निष्कर्ष ते पणतीचे ठरवून गेले

पंचनामा लेखकाचा वाचकाच्या हाती
कागदी ताबुतात ते मज पुरवून गेले

मी मागितली होती तुकडा दाद त्यांना
पश्चात माझ्या ते पाखरा घास भरवून गेले

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

भीमाशंकर च्या पुण्य भूमीत, सह्याद्री च्या कुशीत,

भीमाशंकर च्या पुण्य भूमीत, सह्याद्री च्या कुशीत,
लेण्याद्री,शिवनेरी ओझर च्या शेजारी,
पुणे जिल्यात एका हुतात्म्याचे गाव आहे ,
गावचे नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे,पण ,
" महाराष्ट्र " राज्यात प्रसिद्ध ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद याच गावचे सुपुत्र आहेत ,
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे .
गांधी टोपी या गावात प्रसिद्ध आहे ,,
.२० वाड्या वस्त्यांचा असा हा गाव आहे ,,.
५ दुध डेअरी ,८ केश कर्तनालय ,६ हुंडेकरी .
३ ट्रान्स पोर्ट ,३ मराठी शाळा ,२ सोसायटी .
ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय ,बँक, गावात आहेत .
डिंभे कॅनॉल ने सारा गाव हिरवा गार दिसत आहे
मुंबईकर ,पुणेकर गावच्या महान व्यक्ति आहेत
गावची वेस,सभा मंडप,भली मोठी मंदिरे गावची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे ,
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ मिसळ "लोखंडे "आवटे ,,ची भेळ . ,
"शिवाजी " वडापाव प्रसिद्ध आहे.
साहेब, दादा ,आण्णा यांचे आशीर्वाद आम्हास लाभले आहेत ,
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
यालाच २ रे नाव हुतात्मा बाबू गेनू नगर आहे ,
म्हणूनच आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा.
आमोल घायाळ

विलक्षण सुकुमार तेजात झळकला,

विलक्षण सुकुमार तेजात झळकला,
लाजेची लाली त्याच्या मुखड्यावरची
ठेवणीतला त्याचा इशारा ओळखला..!!

भुलवतो चंद्र शुक्ल-कृष्णाच्या कलेकलेने
नेहमीचाचं त्याचा हा संमोहनाचा डाव,
मनही मग उचंबळून त्याला भिडलं
धडधडणाऱ्या काळजाचा घेतला ठाव..!!

शेजारची अवखळ चांदणी खुदकन हसली
म्हणे माझ्या चंद्रावर हा देखील भाळला,
उत्तरलो मी तुझ्या मंगलमय प्रियकराने
कोजागिरीत पापाचा अंधार बघ जाळला..!!

तारकांच्या गुजगोष्टींनी कमाल तेव्हा केली
प्रकाशाच्या सोहळ्यात सखीची याद आली,
एकलेपणाची हुरहूर क्षणात मनी ह्या दाटली
रम्यतेची भावना तेव्हा आपसूक बाद झाली..!!

युगानुयुगे जगाच्या प्रेमाचा जो उद्घाता
खट्टू झालेलं माझं मन त्याने जाणलं,
प्रितीचं तेज माझ्या ओंजळीत ओतून
मी प्यायलेल्या चैतन्याने सुख भिनलं..!!

मनी जोपासलेल्या प्रीतीच्या चंद्राचा
अधिकचं खुलला रंग छान गव्हाळी,
चंद्राच्या इष्काचा अमृतप्याला रिचवून
माझ्या चंद्रकोरीला लाभली नव्हाळी..!!

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा
...
प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नको..........

सोबतीला कुणी कधीचं जन्मभर राहत नाही

सोबतीला कुणी कधीचं जन्मभर राहत नाही
आपल्या वाटा चोखंदळ निवडायच्या आपण,
आशा कुणाची करण्यात वाया जात हे जीवन
चंदनाच्या शोधात हाती लागत राहत सरपण..!!

मला तर वाटत कोणी प्रेम करूच नये

तु मला भेटतेस रोजच स्वप्नामधे,

हुरळून जातो मी त्या एका स्पर्‍शामधे,

मधेच कधि जाग न यवी तु स्वप्नी अस्ताना

पहुडून जावे आपण दोघे चीम्ब ओल्या काळोखामधे....




मला तर वाटत कोणी प्रेम करूच नये
कारण प्रेम असताच न मिळण्या साठी..
आणि दु:ख देण्या साठी..

नदीकाठी माझं घर प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे

नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे


समजून घे तू फरक
स्वप्न आणि सत्यातला
तुझा आणि माझ्यातला
फक्त वास्तव असलेला.




आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?

एकदा कधी चुकतात माणसं

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला

मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे, पर्व ते- स्मरते मला

खेचता, अवचित मी पडदा तुझे ते लाजुनी,
ओढणीने चेहऱ्याला झाकणे-स्मरते मला.

तुजसी मी बोलाविता, मज भेटण्या, येणे तुझे,
भर दुपारी, तेही अनवाणीच गे-स्मरते मला

विषय विरहाचा, कधी निघताच, रात्री भेटीच्या,
ते तुझे रडुनी, मलाही रडविणे-स्मरते मला.

लपुनी तु भेटायची, मजला सखे गे, ज्या स्थळी,
उलटली वर्षे परंतु, स्थान ते-स्मरता मला.

हा पाऊसही तुझ्यासारखाच कधीही बरसतो

हा पाऊसही तुझ्यासारखाच
कधीही बरसतो
जाताना मला न चुकता सारी
तुझी स्वप्ने देऊन जातो





सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते
शतजन्मीचे हो माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुळी ही रुप गोजिरी
गोड शिरशिरी उरांत फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळाच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळूनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

आलो जरी मी स्वप्न रुपी जीवनात राहीन सदैव तव नयनांत

कधी कधी प्रवास
संपूच नये असं वाटतं
संपण्यासाठी प्रवास
असूच नये असं वाटतं



कादंबरी म्हणून उल्लेख करावा
त्याला सुरवात असावी पण शेवट नसावा..
प्रत्येक पानावर तुझ्या प्रेमाचे शब्द असावे
फक्त त्या शब्दांना पूर्णविराम नसावा...



तुझ्यासाठी जगताना
आणखी काही काय हवं होतं
तुझ्यासाठी मरताना
मात्र मरण माझ स्वस्त होतं



मी असताना केवळ
जगण्याची आशा कर
का जातेस दूर अशी
मजसाठी मरणावरही मात कर




तुझ्यासाठी जगताना
आणखी काही काय हवं होतं
तुझ्यासाठी मरताना
मात्र मरण माझ स्वस्त होतं



आलो जरी मी स्वप्न रुपी जीवनात
राहीन सदैव तव नयनांत
ठाव घेउनी हृदयाचा
तू पाहिलेलं स्वप्न आणेन सत्यात

नशीब जोरावर असतं म्हणून सोन्यासारखी माणसं लाभतात,

नशीब जोरावर असतं म्हणून
सोन्यासारखी माणसं लाभतात,
कमतरता आपल्या जीवनातल्या
त्यांच्याचं येण्याने जागतात..!!

भेटलीस आम्हास दैवयोगाने
बनू तुझ्या अंगणातील फुले,
जीवनात आणिक काय हवं
पदरात घे तुझी हि लेकरे..!!

मनास मिळतो आधार खरा
नाही जाणवत मायेची उणीव,
शब्दांच्या खेळात रमताना
आपलेपणाची दिलीस जाणीव..!!

नाही विसरणार कधीचं प्रेमाला
लाभलं जे ह्या फसव्या दुनियेत,
ताई बनून आलीस आमच्यात
आमचीचं झालीस शब्द किमयेत..!!

रुसवे-फुगवे, मस्ती-मजाक छान
गप्पा-गोष्टी समजुतीची अशी जाण,
गरज लागायची आधाराची जेव्हा
जाणवून दिलंस सत्याचं भान..!!

तुझी साथ ताई हवी आहे कायम
आयुष्याच्या ह्या खडतर प्रवासात,
दोन शब्द प्रेमाचे पाहिजेत मला
सहभागी होण्या सुख दु:खात..!!

खूप प्रेम केले मी तिच्यावर

खूप प्रेम केले मी तिच्यावर

खूप प्रेम केले मी तिच्यावर
पण तिला कळलेच नाही
बरोबर, प्रेम आंधले असतेना
म्हणूनच कदाचित.

ती म्हणाली होती एकदा
की तुझ्याशिवाय जगू शकत नाही
पण तरी ती सोडून गेली
अरे विसरली असेल कदाचित.

खरे प्रेम करणे म्हणजे काय असते
मला माहीतच नाही, मी केल ते की
तिने केल ते? तिने केल तेच
असेल कदाचित.

ती जात होती मला सोडून
मी नाही आडवल,कारण ती खुश
होती म्हणून, कळले असेल का
तिला कदाचित?

मी अजूनही गप्पच आहे
एकाच आशेवर,
येईल ती पुन्हा माझ्या आयुष्यात
कदाचित!!!!!!!!

समोर तु येताच... होतेस अशी स्तब्ध.

खरे जगणे हे असते विदुषकाचे...
दुसरयांच्या हास्यावर घास पोटी...
मनात दु:खाचे डोंगर तरी...
सदा हसूच असते ओठी..



रित्या माझ्या हृदया मध्ये..
ना हक्क तुझा सहवास...
राहतेस तू तिथे अशी..
जसा तूच माझा श्वास..



मी भिजलो पावसात की
त्या भिजलेल्या क्षणात तू...
आठवणींनी भरलेल्या आठवनींच्या
प्रत्येक कणा कणात तू...



रचून मी शब्द ओव्या...
शब्द बांध बांधले...
मी पुन्हा त्या शब्दांना...
या कवीतेत ओवीले..



समोर तु येताच...
होतेस अशी स्तब्ध...
तुझ्या प्रत्येक अबोल प्रश्नाला...
असतो मी ही निशब्द...

एक कहानी त्याची आणि तीची

एक कहानी त्याची आणि तीची

तो आणि ती दोघेही मनोरुग्ण.... एकाच इस्पीतळात ......
इस्पीतळात ज्या दिवसा पासून भेटले होते तेव्हा पासूनचं
त्यांच्यात एक बंध निर्माण झाला होता.... सार्‍यांना त्याचे अप्रूप वाटे...
सारा दिवस ते सोबतचं असायचे... एकमेकांशी कधीचं बोलत नसत...
निशब्द..... जणू त्यांचे मन एकचं होते म्हणून त्यांना शब्दांची गरज नसावी....
असेचं रोज सारखे आजही ते इस्पीतळाच्या आवारात मूकपणे फिरत होते...
चालता चालता ते स्वीमींग पुल पाशी आले... काय झाले कुणास ठावूक...
त्याने तीचा हात झटकला आणि पळत जाउन पाण्यात उडी मारली...
ना बाहेर यायसाठी धडपड्ला..... ना तरंगायसाठी हात पाय मारले
त्या पाण्याच्या तळाशी जावून स्थिरावला .... आत्महत्या करत असावा तो बहुतेक...
हे पाहून क्षणातच ती ने सुध्दा पाण्यात उडी मारली....
त्याची मान पकडून त्याला लागलीच बाहेर घेवून आली... त्याचा जीव वाचवला...
दूसर्‍या दिवशी डॉक्टर आले...हे सगळे पाहून...ऐकून....
त्यांनी तीला त्वरीत हॉस्पीटल मधून सुटी दण्याचे फर्मावले....
कारण आता ती बरी झाली होती.... तीचे मन स्थीर झाले होते ती विचार करु शकत होती...
डॉक्टरांनी तीला बोलावले आणि म्हणाले
" तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे"
तीच्या चेहर्‍यावर तसेचं शांत भाव होते... डोक्टर पुढे म्हणाले
" चांगली बातमी ही की तुला Discharge देण्यात येत आहे कारण
काल तु जे केले त्यावरुन तु आता जबाबदार झाली आहे आणि
तु आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची काळजी घेवू शकते. तुझी कालची कृती
वेड्या माणसाची असूच शकत नाही म्हणून तु आता बाहेरच्या जगात जाण्यासाठी मुक्त आहे...
वाईट बातमी अशी की.... तो काल तु ज्याला वाचवले... तो मेला
त्याने रात्री काल रात्री स्वतःला पंख्याला टांगून घेतले....."
हे सांगताना डॉक्टरांचे डोळे पाणावले ..... त्यांनी तीच्या कडे पाहीले...
ती अजूनही तशीच शांत होती......मग म्हणाली
" त्याने स्वतःला नाही टंगून घेतले... तो ओला झाला होता ना
म्हणून लवकर वाळावा यासाठी मी त्याला
पंख्याला टांगले......... मी घरी केव्हा जाउ शकते ?????
काय बोलावे डॉक्टरांना कळेनासे झाले .....!!!! डॉक्टरांकडे तीच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते...

तू खुदकन हसलीस कि.... सारे जीवन गालात हसते.

तुझ्या मिठीत येण्यास
आतुर हा जीव
हतबल हे हात
करी मनाची कीव



मी आहे थोडा वेगळा...
शब्दात रमून जाणारा...
तुझ्या आठवणींना ...
शब्दात जोडणारा.



कोजागिरीचा चंद्र कसा...
तुझ्या पुढे झुकतोय....
माझ्या या चांदणी समोर...
तो हि दोन क्षण मागतोय...



चेहरा तुझा ग....
जसा चंद्र पौर्णिमेचा ....
रुसतेस कधी कधी तू...
तो दिवस अमावाशेचा...


ओठांची किमया खरी..
ओठांनाच कळते...
ओठांवर ओठ टेकवताच...
ओठ ही थर थर कापते..


तू रुसलीस कि....
नशीब माझे रुसते...
तू खुदकन हसलीस कि....
सारे जीवन गालात हसते.




भिरभिरत्या पाखराचे ...
सुंदर पंख जाळीदार ....
पंखात बळ एवढे....
कि व्यापून जाईल आकाश सारं

सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

एक झाड पाहिलं बरंच मोठं होतं

झाड झाड व मी बोलतो....!!

एक झाड पाहिलं
बरंच मोठं होतं
पण आयुष्यात त्याच्या
फारसं सुख नव्हतं...
मी त्याच्या जवळ बसलो
आम्ही दोघे सारखेच
अन रोजचे असून सुद्धा
एकमेकांना अनोळखेच....
झाड वयाने मोठे होते
मला भीतीयुक्त आदर होता
पण झाडाला त्या परिस्थितीचा
माझ्याशी काही आवच नव्ह्ता....!!
मला म्हणाले ते
'आता आपण दोघे सारखेच
वय वगैरे काही नाही
दुःख वाटून घेऊ दोघेच...!'
कुणी नाही मला
असे त्याचे दुःख
एकाकी नसावा कधीही मी
एवढे माझे सुख....
खरा मित्र माझा
हे झाडच आहे मला कळाले
इतर गोष्टींवरून आपसूकच
झाडे कडे माझे पाउल वळाले....!!
मला म्हणाले 'साथ तुझी लाभली
तर सुखाचा होईल आयुष्य प्रवास...'
मी म्हणालो 'साथ आहे मी
राहीन तुझ्या आश्रयास...!!'
गार वारा आला
आम्ही दोघेही सुखावलो
दोघांच्या मनाचे ओझे उतरले
पुन्हा आपापल्या मार्ग निघालो....

झाड झाड व मी बोलतो....

आयुष्यभर ह्यांनी माझ्या शब्दांचे वाभाडे काढले

फ़ाटकी तुझी झोळी..
अन माझं नशीब फाटलेलं...
किती ठीगळं लावू त्याला..
ते जागो जागी गुरफटलेलं


पाणावलेल्या डोळ्यांनी
कोरडे आयुष्य पहिले
रंग उडून गेले होते सारे
फक्त व्रणांचे डाग ते राहिले...



आयुष्यभर ह्यांनी माझ्या
शब्दांचे वाभाडे काढले
पण मेल्यावर का होईना माझे
किंचितसे वजन वाढले....


सर्वच विचारतात मला सये
कसे फुलवले आठवांचे मळे
मी मात्र नियमित लपवले गं
आसवांचे ते साठवलेले तळे

तुझ्या सहवासात... शिकलो मी जगायला...

ना दावा काम आई न दुआ काम आई
जब जिन्दगी रुलानाही चाहती है तो
मुस्कुराने के लिए कोई वजह काम ना आई.



मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....



हसायचं होत तुझ्या संगे...
पण तू मला रडवून गेलीस.. ...
जगायचं होत तुझ्या संगे..
पण तू मला जिवंत पाने मारून गेलीस.



जाणले जे हृदय
ते आपले करता आले नाही
आठवणीतच राहिले फक्त
सोबत त्या जगताच आले नाही .....



तुझ्या सहवासात...
शिकलो मी जगायला...
ती होतीस सोबतीला म्हणून...
शिकलो कविता लिहायला..

सागर तटाचा एक संवाद

सागर तटाचा एक संवाद
***********************
अनुद्विग्न अर्नावाचा तटे वर जीव किती
शांत सांझी त्यांच्या संवाद मज लाभला
अर्णव म्हणे तटला
तुझे तटणे माझ्या उरी
एक मंथन करी
भावनाचे उफान मग
त्या डोलणाऱ्या लहरी
.....
तटाची वाणी हृदयाला भिनली
तुझ्यात सामावण्या साठीच
मी इथे जन्मली
माझे जीवन तुझ्या ओंजळीत आहेत
तुझ्या लहरीचे आभार
मी हे स्वप्न जगत आहे
तुझ्या त्या उफान्लेल्या भवनाच्या
लहरी मज भावे
तुझ्या स्पर्श साठी मी स्वतः
हि पौर्णिमेची वाटे पाहे
..........
अर्णव वाढला इथेच
तुझ्या विना माझ्या अस्तित्व
म्हणजे सुसाटलेला वारा ................

एक गोड प्रेमपत्र ......

एक गोड प्रेमपत्र ..........

खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचे
तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !
हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…

नक्किच i can fill that

जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना
हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !

खरच मला नाहि अजुन विश्वास
तु कित्ति गोड हसतेस हल्लि…
मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !

i m just falling into love.........i m just crashing into love

मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?

का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…
पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !

खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !

काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…
तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते !

तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली
तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!

ये ना लवकर ….

तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते

काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर

कोंड्तोय श्वास रडतोय मन
जीवाची होतीये फार उधळण
कसले कायदे तुमच्या मातीचे
जिथे माणसालाच नाही माणसाच्या
अस्तित्वाची आठवण ..



उसने मागितले त्याने हृदय मला
व्याजाचा मी सौदा केला
पण तो परतलाच नाही
हृदया सोबत स्वप्नांचा
व्याज हि बुडाला .........



काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर
म्हणून तोडणारयाला ते टोचत
असतात पण काटे बाजूला केले
जाताना गुलाब का शांत बसतात?



नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..




हाथो कि लकिरे अधूरी हो तो किस्‍मत मे दोस्‍ती नही होती
हाथो मे दोस्‍तो का हाथ हो तो लकिरो कि भी जरूरत नही होती



काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
...
कायम साथ देत राहातात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात..

इज़हार-ए-इश्क करते हैं हुस्नवाले

इज़हार-ए-इश्क करते हैं हुस्नवाले आँगन राह तकता तेरी डोली
आकर भरले तू रंग सुनी हैं क़यामत से इस दिल की रंगोली,
बहोत सहे पतझड़ के मौसम अब तमन्ना हैं फूलों के खिलने की
खुशियों से भर दू मैं तेरा दामन तू प्यार से भर दे मेरी झोली..!!

तुझ्या प्रेमाची सावली लाभली असती

तुझ्या प्रेमाची सावली लाभली असती
तर दाटली असती हिरवळ चोहीकडे
तुझ्या माझ्या विरहाने मात्र
तो वाळवंट हि राहिला एक कोडे



सिमेंटच्या जंगलात नात्यातल्या
संधिसाधू लोकांचा गोतावळा,
हक्काने निलाजरे मागतात
असे आवळा देऊन कोहळा..!!

गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..

नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे, पण "आमेरिका " सारखी ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद या गावचे सुपुत्र आहेत
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे
मुंबईकर ,पुणेकर मित्र मंडळ यातील गावच्या महान व्यक्ति आहेत
गावची वेस,सभा मंडप आमची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ ची पावभाजी, "लोखंडे " चा वडापाव, "शिवाजी " चा चायनीज आहे.
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..

आमोल घायाळ

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

ति तुझी भेट शेवट्ची...

कागदाच्या अंगणी शब्दांचे सड़े
पाहुनी काहींचे पाणावतात कडे
वेचताना दुखः अमाप मजला
तरी वेचून टाकले परडीत थोडे



शब्द जुळविताना...
एकच विचार मनात...
त्यांना वाचून तू...
एकदा हसशील का गालात...


ति तुझी भेट शेवट्ची...
तू होतिस त्याला बिलगून..
कसे जगत होतिस तु..
मला तुझ्या पासुन वगळून..

स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,

स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
"तुला बुद्धी हवी का सौंदर्य?"
तेव्हा ती म्हणाली,
"बुद्धीची गरज नाही, सौंदर्याच दे!"
देव म्हणाला, "का?"
ती म्हणाली, "बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते!"

तुझ्या मनाचे SYSTEM मला कळले नाही,

तुझ्या मनाचे SYSTEM मला कळले नाही,

BOOT केली OS पण HARDWARE जुडले नाही,

INSERT केली CDROM पण त्यात सापडले नाही DRIVER

पर्यंत केला NET DOWNLOAD चा पण आले त्यात VIRUS

आता शक्य नाही COMPLETE SYSTEM FORMATTING

त्या पेक्ष्या सोपे TRY NEW MACHINE.............

जावूनी सांगा तिला न फरक तिच्या जाण्यचा मला

मनाच्या घडीव होडीला
विचारांची बेलगाम शिडं,
जीवन सागरात शांतता
ह्यांची उगाचंच फडफड..!!



जावूनी सांगा तिला
न फरक तिच्या जाण्यचा मला

अश्रूचे का वाहीन मी पाट
कोणी सांगितले मी पाहीन तिची वाट

ना घेईन साक्ष त्या प्रीतीची
ना भीती मजला तिच्या विरहाची

जरी कधी छळेल हा एकांत
भिऊ नकोस ......नाही जाणार कधी तुझ्या आठवणीत




देवपण घेऊन दगड
लागले आहेत मिरवू,
देवभोळेपणात माणसही
लागली त्यांना भरवू..!!

काजळाची ती किमया सारी

घायाळ हृदयाच्या हाती
मी एक गुलाब दिले
त्याच्याच रक़्ताने त्यास
लाल रंग प्रदान केले


प्रेम होता गुर्मीत
विश्वासास कमी लेखित
एक दिन मोडून पडला विश्वास
त्यापासून प्रेम फ़क़्त आभास



काजळाची ती किमया सारी
फिरवते मज दुनिया सारी
अप्सरा कि आहेस तू परी
तुज पाहण्याचा ह्या दिलास नाद भारी

दुखत असल्या वर जग कसा धावत येतो

तू परत येऊ शकशील
माझ्या वेदनेच्या वाटेवरून
बघ पोहोता येते का
माझ्या अश्रूंच्या लाटेवरून...


आज चार जण जमा झाले भोवती
खूप चांगला होता शब्द आले कानी
मीठ चोळले होते ज्यांनी जखमेवर
आज का त्यांच्याही डोळ्यात पाणी ?




बेजार तो माणूस
जिथे प्रेमाचा आजार
कंगाल होतो भावना विकून
असा वेडझवा बाजार....



दुखत असल्या वर जग कसा धावत येतो
प्रत्येक आसवांची माझ्या तो मजा घेतो
मग सुख त्यांना का बघवत नाही
मी हसताना मात्र ते माझ्या सोबत हसत नाही.....





क्षण साधले तुला बोलायचे म्हणून
पण क्षण तो येता सगळेच विसरले
तुला सांगायचे होते माझे प्रेम
पण ओठांवर येऊन शब्द परतले.


तुज हसवण्यास
मी रडू पाहतो
विरहाचे ते क्षण
भुलवू पाहतो


चार घासात
पोट भरवतो
बाकी सर्व सख्ये
तुझ्या ओंजळीत टाकतो

आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना

संकटाला कधी कंटाळ्याच नसत
त्याला सामोर जायचं असत
कुणी नाव ठेवलं म्हणून थांबायचं नसत
आपल चांगल काम करायचं असत
जीवनात खूप करण्याजोग असत
आपल फक्त तिकड लक्ष नसत !!!



आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना
दाटून आले होते मन पण भिजल्या नाही पापण्या
त्याच्या जायच्या मार्गावर का म्हणून माझ्या आसवांचे आच्छादन
त्याला थांबण्या साठी केलेला एक अजून प्रयंत्न
ठाऊक आहे मला तो आता माझा नाही
पण आज हि मन माझे वेडे त्याच्या येण्याची वाट जोही.

तिचा मला एकदा फोन आला

तिचा मला एकदा फोन आला
ती म्हणाली...
कसा आहेस...?
इकडून उत्तर आले
सखे...
द पर्सन यु आर ट्राइंग टू रीच डस एकसिस्त...

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा,
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,
नशीबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटु,
आठवणीला एकदा एकत्र मिळुन वेचु,
पण तेंव्हा सर्व काही बदलेले असेल,
कोणीतरी बोलावतय म्हणुन भेट लवकर सुटेल,
लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा-गोष्टी राहणार नाहीत,
आठवणींचा हा झरामग त्या दिशेने वाहणार नाही,
आज सोबत आहोत वाटेल तसे जगुन घ्या,
जीवनभर पुरतील अशा आठवणी जपुन घ्या.

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

झाडा सारखे बहरून तिचे हसणे

झाडा सारखे बहरून
तिचे हसणे
वारा येऊन गेल्यावर
माझे पाला पाचोळा वेचणे...



हसतो का आज तू माझ्या वर
उद्या तुझी हि वेळ येईल
जरी आज मी तुटले तरी
उदया परत झेप घेई


दिव्याला असते का अंधाराची भीती
सूर्याला सालीलाची
चंद्राला प्रखर तेजाची
मग का या मनाला भीत पराजयाची

डोळ्यात भावनांचे ,बीज काळजाने पेरले
अंकुरल्या त्या रोपा,तुज नाकारता ना आले |

शिंपले तारुण्य माझे,र्हद्यास तुझ्या कळाले
बरसले जे सूर त्यातून ,तुज रोकता ना आले |

आकाश म्हणू कि तुजला ,ती वाहणारी सरिता
सर येता पावसाची ,तुज भिजता परी न आले |

माझ्याकडे असावी ,तुझी बहरलेली प्रीती
न्हाता आठवात डोळे ,तुज पाहता ना आले |

जाता रुसुनी सखे तू,मना समजावता ना आले
नजरेस माझ्या परंतु ,तुज हुलाकावता ना आले ||

ज्याच्या घरी अंधार असेल

ज्याच्या घरी अंधार असेल
अश्रुंवाचून कांहीच नसेल
त्याच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव ....'

तेल नाही वात नाही
अंधारात हात नाही
त्यांच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव............'

*****जय मातादी !!!!!!****
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
मनामनात भक्ती आणि शक्तीची ज्योत अखंड तेवत राहू दे !!!!!
ज्ञाचा दिवा घर-घरात उजळू दे !!!!!!!!!!

*******जय मातादी *********

मी तो नव्हे... जो नाते तोडून जाईन...

आकाशातून निखळला तारा..
धरतीच्या कुशीत येऊन विसावला...
धरतीने दिले त्याला प्रेम आईचे..
धरती पासून विळग होऊन शुभ्र चंद्र उगवला...



तुझ्या हूंकाराची वाट पाहून...
मन माझे व्याकूळते...
तु मात्र मुक धारण करतेस...
अन हृदय माझे काकूळते




तु आलीस भेटायला..
की पाऊसही रिम झिम बरसायचा..
तुझी माझी भेट जणू..
तो ही लपून बघायचा



तू होतीस परकी...
तरी आपली वाटली...
परक्यांवर असे हे आपलेपण..
म्हणूनच मनात भीती दाटली..



संध्याकाळ चा उनाड वारा...
हळूच चाहूल तुझी देऊन जातो...
असाच आता रोज तो...
मला फ़सवून जातो..



आज ही नभात या....
एक पक्षी विहारतो...
जायचे त्यास कोणत्या दिशा..
असे का विचारतो...


मी तो नव्हे...
जो नाते तोडून जाईन...
मी मात्र जाता जाता..
नवे नाते जोडून जाईन..

नियती चे खेळ

नियती चे खेळ हे
कुणास ठाऊक आहे
आजचे अगाध सत्य
उद्या पोकळ आहे....
विचारांशी कधी मन जुडले होते
जेवा हि जुडले मेंदू चे घोडे अडले होते
का कल्पकतेचे राज्य इतके समृद्ध आहे
जे वास्तव्या पासून किती तरी लांब आहे
वाहून जातो भावना मध्ये माणूस
भुरळ आहे फक्त
हे मायाजाल आहे
उघडे डोळे पण
समोर अंधार आहे..

रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या

शब्दाविना वाच सखे
भाव माझ्या मनातले
ओढ तुझी ,साथ तुझी
अर्थ जाण स्पर्शातले



पुन्हा नव्याने भेटायाला ताजेतवाने होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या

आज पुन्हा रात्र आपली होती झकास रंगलेली
मैफिलीची उर्जा अशी नसानसात भिनलेली
जाऊनी आता निद्रेच्या जरा अधीन होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या

आयुष्याच्या सायंकाळी रात्रीच्या या कातरवेळी
घालविण्या वेळ असा सवंगड्यांची जमली मेळी
उदयास पाहण्या पुन्हा नव्याने आपण जागे होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या



आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची.......!

मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे

माझ्या प्रेमाची अबोल भाषा सखे
सांग कधी ग होणार तुला अवगत,
का राहणार तू नेहमीचं अनभिज्ञ
आणि होणार माझी वेडी फसगत..!



तुझ्या मनातले समजले म्हणून पडलो तुझ्या प्रेमात
तू नसती फिरवली नजर माझ्या मनात सखे
तर राहिलो असतो तुझ्या प्रेमाविना?????


निपजले मोती काही सये
आठवांच्या शिंपल्यातून
हास्य काहींचे पाहीले मी
भिजलेल्या पापण्यांतून



मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे
रेहेम तेरे इश्क पर उसका ज़माने तक रहेगा,
पूरी कायनात शामिल तेरी चाहत की वफ़ा में
सफ़र अनजाने दर्द का बेशक दीवाने तक रहेगा..!!




केव्हातरी जागेन मी
साधासुधा वागेन मी

आधार ही माझाच ना ?
बोलास त्या जागेन मी

मी का धरू शंका मनी ?
जाहीर हे बोलेन मी

वादास ना थारा इथे
साऱ्या जगा सांगेन मी

आहे जणू दीपावली
नेत्र दिवा लावेन मी

काव्यात का मी रंगतो
केव्हातरी सांगेन मी

जीवास या गोडी तूझी
केव्हातरी सांगेन मी

राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट अमरप्रेम

अमरप्रेम
निखळ मैत्रीचे खिस्से तर आपण खूप ऐकलेत पण निखळ आणि तंत्रशुद्ध प्रेम म्हणजे अमरप्रेम. यामध्ये कोणताही मोह नाही, कोणताही स्वार्थ नाही, आणि वासनेचा तर कणही नाही. प्रेम म्हंटल कि आपल्या समोर सर्वप्रथम कोणी येत तर रोमिओ आणि ज्युलीएट किंवा लैला आणि मज्नू. अगदी नाहीच नाही तर हिंदी सिनेमातला एखादा नट. पण अमरप्रेम ही कथा अशा किती भारतीयांना माहित आहे? अमरप्रेम शब्द नाही तर कथा. अमरप्रेम ही भारतातील एक सत्य घटना. ज्याचा उलगडा अजूनही झाला नाही कारण ही एका भारतीय खेड्यातील घटना आहे. "अमरप्रेम" या शब्दावर एक मराठी मालिकाही काही दिवस चालली पण त्यात काही वेगळेच होते. काय माहित त्यांनाही या गोष्टीची कल्पना आहे कि नाही ते.
भारतातील उत्तरांचल राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट आहे. एका रेल्वे स्थानकावर दोन आगगाड्या थांबल्या होत्या. सगळा गोंधळ होता. कुठे चणेवाला ओरडतोय तर मधेच चहावाला. जो तो आपल्या कामात व्यस्त होता. आणि इथेच सुरवात झाली त्या अमर प्रेमाची. एक अज्ञात तरुण मुलगा व एक सालस मुलगी समोरासमोरून जात होते. काही अंतरावर असताना त्यांची नजरानजर झाली. अगदी चार-पाच घटका अचानक सरून गेल्या, दोघजण बाजूने निघून गेले पण जाताना त्यांचा किंचितसा स्पर्श एकमेकांच्या हाताना झाला. बस्स हेच ते प्रेम. पुढे ते दोघेही आपापल्या दिशेने निघून गेले. जाताना दोघेही एकमेकांना पाहतच राहिले, त्या मुलीच्या बहिणीने तिला आवाज दिला. आणि त्या मुलाला तिचे नाव माहित झाले. दोघांच्याही गाड्या निघाल्या, दोघेही निघून गेले.
जाताना त्या मुलाच्या मनात विचारचक्र सुरु झाले, फक्त तिचा आणि तिचाच विचार. कोण कुठली मुलगी पण ती दिसताच क्षणी काळजाचा ठोका वाजला. मन अजूनही मानत नाही कि ती निघून गेली. तिचा इतका विचार तो करायला लागला कि घरी पोहचेपर्यंत तो तिच्या प्रेमात वेडा झाला. आणि तिच्या नावाने जोर-जोरात ओरडू लागला. आणि वाट दिसेल तिकडे निघाला. तिचा तो विरह त्याला असह्य झाला होता. कोणाशी काही बोलणे नाही. कोणाला काही विचारणे नाही. फक्त तिचे नाव घेत तो चालू लागला. लोक त्याला मारू लागले,शिव्या देऊ लागले, लहान मुले मागून फिरून त्याला चिडवू लागली.
तब्बल साडेचार वर्षांनी तो मुलगा असाच भटकत असताना एका गावात पोहोचला, तिथेही त्याला इतर गावांप्रमाणेच वागणूक मिळाली. लहान मुले त्याला दगड मारत होती आणि तो त्या मुलीचे नाव घेत वाचण्यासाठी पळत होता. त्या गावातील एक मुलगा घरी गेला आणि त्याने "गावात कोणीतरी वेडा आला आहे, आणि तुझ्या नावाने ओरडत आहे" असे सांगितले. त्या वेडयाचे वर्णन ऐकून त्या मुलीला धक्काच बसला. तिने हा तोच मुलगा आहे हे ओळखले आणि ती सुद्धा वेड्यासारखी पळत सुटली. त्या मुलाजवळ पोहचल्यावर त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अचानक शांत झाला.
त्या मुलीनेही धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. सर्व मुलांना बाजूला करून ती जवळच असलेल्या झाडाखाली बसली, मुलगाही तिच्या मांडीवर डोके ठेऊन बसला, आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 'बस्स माझे प्रेम मला मिळाले' असे म्हणून त्याने तिच्या मांडीवरच प्राण सोडले, आणि त्याच क्षणी विरहात व्याकूळ होऊन त्या मुलीनेही त्याच अवस्थेत प्राण सोडले. संपले प्रेम.
काय पटतंय "संपले प्रेम" ........ नाही ना? म्हणूनच हे "अमरप्रेम". हे प्रेम कधी संपणे शक्यच नाही. भारत सरकारच्या वतीने या प्रेमाचा गौरव म्हणून तेथे त्यांच्या मृत्यू अवस्थेचे एक शिल्प उभारण्यात आले आहे. आणि त्याखाली कोरले आहे "अमरप्रेम".

विसरलो मी कालचे माझे किती श्वास होते

अपेक्षा
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा


तुमच्या आमच्या प्रेमात त्या गुलाबाचे काय कोडे,

पण प्रत्येक प्रोपोजल नंतर त्याचीच मान मुरडे..


विसरलो मी कालचे
माझे किती श्वास होते
हात तुझा हाती अन
सारे तुझे भास होते

पुन्हा पुन्हा आठवतो
मंद हळव्या क्षणांना
माझ्यासाठी जसे काही
जगण्याची आस होते

लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते

आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते

डोळस प्रेम - एक कथा....

डोळस प्रेम - एक कथा....

त्याच्या आयुश्यातला सर्वात मोठा धक्का दायक क्षण नुकताच घडून गेला होता, तसा तो खुप आनंदी मुलगा पण त्याला शांत अन एकटे राहायलाच जास्त आवडायचे. पण त्या घटनेने तो खुप हेळाऊन गेला होता य आधी जे पाहीले नाही त्या सर्वाला अचानक सामोरे गेला पण काय करणार नियतिच्या मनात तेच होते..

नियतीच्या मनात अजूनही खुप काही होते, म्हणूनच तर तिची अन त्याची भेट झाली. म्हणतात ना ज्याचे दु:ख त्यालाच कळते, पण येथे दोघांची दु:खे सारखीच होती. म्हणून त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले.. एक मेकाला दु:खात साथ देता देता ते एकमेकांच्या सुखाचे हि साथी झाले. त्यांनी एकमेका समोर कधी कबूल नाही केले पण एकमेकावर खुप प्रेम करु लागले होते.

कबूल हि कसे करतील आपला हा निर्दयी समाजाने त्यांना सुखाने जगू नसते दिले... पोथि पुराणात म्हटले आहे प्रेमाला कोणतीहि सीमा मर्यादा नसते.. आणि त्या दोघांनीही समाजाच्या पाठमोरे आपल्या प्रेमाचे अंकूर उमलवू लागले.. तो थोडा लाजाळू होता या आधी मुलीशी बोलायचे म्हटले तर हनूमानाच्या पाया पडून जाणारा, मात्र तिच्या सोबत असताना तो सारं जग तिच्यातच सामावले आहे असे भासून तिच्यातच रमून जायचा, अन ती पण त्याच्या बरोबर खुप खुश असायची तो सोबत असला की सारी दु:ख विसरुन रमून जायची..

तासन तास फोन वर बोलणे, वैगरे तसे रोज ते शरीराने दुर असले तरी मनाने सतत एकमेकांसोबत असायचे. एखाद्या वेळी त्याने फोन केला नाही की ती खुप अस्वस्थ होऊन जाई. त्यांनी एकमेकाच्या दु:खाला एकमेकाचा सहारा बनविला अन प्रत्येक दिवस नव्याने जगू लागले.. असे एक वर्ष कधी उलटून गेले त्यांना कळलेच नाही, ते एकमेकांसोबत असताना वेळेचे भानच राहायचे नाही त्यांना.

एक दिवस एक बातमी तिने त्याला सांगीतली अन त्याच्या पायाखालची जमीन निसट्ली, त्याला काय करावे कळेना. ती बातमी तिच्या लग्नाची होती नुकलेच पाहूणे तिला पाहून गेले होते. तिलाही काही सुचेना अश्या वेळी काय करावे. तो तर स्तब्ध झाला होता. तो तिला विचारणार माझ्याशी लग्न करशील..? पण त्याचे शब्द ओठीच अडले, त्याला माहीत होते या नात्याला ह निष्ठूर समाज कटू नजरेने पाहणार अन त्याच्या पेक्षा तिलाच जास्त त्रास देणारं... नियतीने त्या दोघांना काही कारणस्तव एकत्र आणले खरे पण आयुष्य भरासाठी एकमेकाची सोबत घडवून द्यायची राहून गेली. नी या प्रसंगाला एकत्र समोरे जायचे ठरवले होते या नियतीचे नियम तोडून...

काही दिवसात लग्न झाले, दोघेही आधी सारखेच आनंदी एकमेकांसोबत गप्पा गोष्टी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक दिवस घालवू लागले.. फ़रक इतकाच की लग्ना नंतर ते कधीही भेटले नाहीत.. पण प्रेमा नंतर मैत्री या अशक्य वाक्याला त्यांनी शक्य करून दाखविले, ती तिच्या नवरया सोबत खुश होती. अन तीला खुश पाहून तो पण आनंदी होता..

प्रेम म्हणजे शरिराने एक होणे नाही तर, प्रेम म्हणजे मने एकरूप होणे... जर मनात ठाम विश्वास असेल मग कोणत्याही प्रसंगाला तुम्ही आनंदाने सामोरे जाऊ शकता... नाते तोडण्या पेक्षा ते जास्तीत जास्त कसे टीकवता येईल या कडे लक्ष द्या..


अंतरजाल साभार- कवी- लेखक.. (गुपित)

क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,

गुज माझ्या मनीचे सांगेन मी केव्हातरी
काय माझे अडाखे मांडेन मी केव्हातरी

रोज माझ्या मनाशी संवाद माझा चालतो
वाद संवाद सारे ऐकेन मी केव्हातरी

आज डोळे तुझ्या या वाटेकडे का लागले ?
बोललो का चुकीचे शोधेन मी केव्हातरी


माझ्या गावी जाताना...
तुझ्या गावचा रस्ता मध्येच लागतो...
मग मी पण नकळत ...
त्याच वाटेकडे वळतो...



क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,
तेरा आशिक हि धोकेबाज था ,
क्यू तोडा उन नाजूक पंखुडीको ,
जब तेरे हि सर पर बेवफाई का ताज था

जाणून घे आज चारीत्र्यास माझ्या

जाणून घे आज चारीत्र्यास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या

छोट्याशा आयुष्याचा जमवू मेळ
एकमेका देऊ आता उरलेला वेळ
फुलवीन प्रेममळा संगतीने तुझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या

मिठीमध्ये तुझ्या विसरलो भान
रात्रंदिन गातो मी तुझे गुणगान
देई आता साद तु हाकेला माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या

संगतीने तुझ्या नवी शिखरे गाठीन
ओंजळीत तुझ्या सारी स्वप्नेही वाहीन
देई बळ सखे आता पंखास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या

वेड्या त्या मनासाठी

सोबत जगण्यास जेव्हा
विचारांची अडगळ ठरली
बहारेली प्रीत ती तयांची
अवेळी पानगळ ठरली



वेड्या त्या मनासाठी ,सख्या मी गाव शोधला होता
तू होतास सोबतीला ,म्हणून डावही मांडला होता
रंगात येता डाव मी, हात आशेचा धरिला होता
घालण्या सडा प्रीतीचा ,तेंव्हा प्राजक्तहि आला होता