सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर

कोंड्तोय श्वास रडतोय मन
जीवाची होतीये फार उधळण
कसले कायदे तुमच्या मातीचे
जिथे माणसालाच नाही माणसाच्या
अस्तित्वाची आठवण ..



उसने मागितले त्याने हृदय मला
व्याजाचा मी सौदा केला
पण तो परतलाच नाही
हृदया सोबत स्वप्नांचा
व्याज हि बुडाला .........



काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर
म्हणून तोडणारयाला ते टोचत
असतात पण काटे बाजूला केले
जाताना गुलाब का शांत बसतात?



नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..




हाथो कि लकिरे अधूरी हो तो किस्‍मत मे दोस्‍ती नही होती
हाथो मे दोस्‍तो का हाथ हो तो लकिरो कि भी जरूरत नही होती



काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
...
कायम साथ देत राहातात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा