रविवार, ३१ जुलै, २०११

"भास तुझा"

त्या गंधीत फुलांप्रमाणे तव कांती मज भासली
स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

त्या रिमझिमणार्‍या पाऊस धारा
अंगी जागला शहारी प्रदेश सारा
जणू सुरेख मोर पिसारा
त्यात भासे तुझा गोड चेहरा
प्रित कळी उरी ऊमलली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

मंद झुळूक ते वार्‍याचे
गीत गाई तुझे-माझे
भास होता तु येण्याचे
श्वास वाढ्ती स्पंदनांचे
वसुंधरा ही श्रूंगार ल्याली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

गालीचे मग हरिताचे सुने-सुने बनती
परतीची वाट जेव्हा पद वळती
ओहळाची आसवे मग खळखळती
मधुर संगीत त्यांचे गगनी भिडती
आनंदास आज भरती आली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

इंद्रधनुचे बांधत तोरण, चहूकडे उधळत हिरवेपण,

फुलपाखरु फुलांवर अलगद..
आपले रंग सोडून जातात...
काही मनातील भाव ही..
न सांगताच कळून जातात..

शब्दांनी शब्दांच्या भाषेत..
शब्द खेळ केले..
शब्दांच्या या खेळामध्ये..
शब्दच हरुन गेले..

शब्दांचा हा चोर खेळ...
आता जास्तच वाढला आहे..
तुझ्या साठी साठवलेला प्रत्येक शब्द..
तुझ्या समोरच अडला आहे..

कोसळणारा पावसात..प्रत्येक थेंब,
चिंब चिंब भिजवत आहे..
त्याच्या प्रत्येक थेंबात ..
तुझ्या स्पर्शाची जाणीव करुन देत आहे..

खळखळणारं नदीचं पाणी..
रानपाखरांची मंजूळ गाणी..
हिरवी गार झाली हि माती..
श्रावण स्तुती करु मी किती..


इंद्रधनुचे बांधत तोरण,
चहूकडे उधळत हिरवेपण,
सजलेल्या सृष्टीचा साजन,
उन्ह सांगते:
आला श्रावण,
श्रावण आला..

उद्या मी मगंसुञ आणतो

एकदा एक मुलगी रक्शाबंधनच ्या दिवशी राखी घेउन आली...
मि College कट्टयावर बसलो होतो,
ति माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हात पुढॆ कर, मला राखीबांधाय ची आहे तुला ,
मी म्हणालो मुळीच नाही.
ति म्हणाली काय झालं ? काय झालं ? काय Problem आहे ?
मी म्हणालो वा! ग वा! शहाणीचआहेस की, उद्या मी मगंसुञ आणतो, तु घेशील का बांधुन ?

जीवनाचे गणित

जीवनाचे गणित
वाटत असते अंधाराची रात्र आता नाही उजळणार
जिवनाचे हे गणित कधीच नाही सुटणार
तरीही अचानक आयुष्यात एक दिवस असा येतो
या सगळ्या गोष्ठींचा चेहरा मोहराच बदलुन जातो

कुठुन तरी कुठलातरी एक कवी येतो
त्या गणितातुन जिवनाचे गाणेच गाऊन जातो
आणि मग
आजवर न उलगडलेले कोडे हळुवार उलगडते
निराशेचा अंधार संपतो अन जिवन सारं उजळु लागते

का उगाचं भिजू मी त्या उनाड पावसात

का उगाचं भिजू मी त्या उनाड पावसात
प्रीतीच्या अभिषेकात न्हाऊन निघत असताना,
पण किंचितसे डोळे आणि मनही भिजत
पावसाच्या सरी एकट्यानेच झेलताना..!!

ओळख नसते पाळख नसते

ओळख नसते पाळख नसते, असे आपणास कोणीतरी भेटते.
मग एकमेकांची ओळख पटते, त्याची आपली गट्टी जमते.
एकमेकांच्या मनातील भाषा कळते इकडेतिकडे मन वळते.
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे आवघड असते.
दूर राहणे असह्य होते का असे हे नाते असते.
अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री" असते

आठवणींच्या पावसाने

आठवणींच्या पावसाने ,
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….

सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….

आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा....!!

प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,

अचानक पाऊस आल्यावर काही
थेंब तिच्या ओठांवर थांबले,
क्षणभर मी पाहतच राहिलो
पहिल्यांदाचं मला थेंब व्हावेसे वाटले..!!


प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,
म्हणून मी तीलाच जपली..
प्रेम माझ्या भाग्यात नाही..
पण मैत्रीने लाज राखली..




माझ्या ह्र्द्यातल्या झोपाळ्यावर..
घेऊ चल आपणही हिंदोळा..
झोके घेत घेत मग..
घेऊन जाऊ आपले प्रेम आभाळा..




खुभी नक्कीच होती ग माझ्यात तेव्हाच
तुझ्या हृदयात ठाण जे मांडू शकलो . . .
अन मला वाटत, न विसरू शकणारे असे
अविस्मरणीय क्षण नक्कीच देऊन बसलो . . .

जेव्हा तुला कोणी आवडतो..

जेव्हा तुला कोणी आवडतो..
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....

जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाही......

जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाही......
जवळ असताना मात्र ऐकमेकांशी पटत नाही....
कळतं सार पण वळत नाही......
खरचं काय असते मैत्री ते दुर गेल्याशिवाय कळत नाही...

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..
आनंद दाखवण्यासाठी हसायची गरज नसते..

दु : ख दाखवायला आसवांची गरज नसते..
न बोलता ज्यामध्ये सगळे समजते ती म्हणजे मैत्री........

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..

मन हे वेड असते,
हे तुझ्या भोवती फ़िरताना समजले,
तूला मात्र ते..
कधीच नाही उमजले..



आज पावसाच्या थेंबात,
एक वेगळाच हर्ष दिसतोय..
जसा त्यानेही तुला..
केला स्पर्श वाटतोय..


आयुष्याच्या वाटेवर निर्णय घेताना,
आपणच आपले घ्यावे...
म्हणजे नंतर कुणाला दोष देताना..
आपलेच नाव पहीले यावे..


आला आला श्रावण आला..
घेऊनी नवी उम्मेद नवा बहर..
श्रावणाच्या आगमनाने..
झाडे वेली पाने फ़ुले.. डोलू लागली...
आला आला श्रावण आला...
घेऊन पुन्हा हर्ष नवा..
पक्षी गाती गीत नवे ..
झाडांवरती फुलती थवे...




आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..

शुक्रवार, २९ जुलै, २०११

वयानुसार मुलाचे प्रेम

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥

१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥

"माझिया प्रियाला प्रीतच कळेना "

गेलो होतो परीक्षेला तिथे काही आठवेना
गेलो होतो परीक्षेला तिथे काही आठवेना
काय सांगू त्या सरांना कि
"माझिया प्रियाला प्रीतच कळेना "



प्रेम हे दोन जिवांच नात असत,
दोघांनी ते समजावून घ्यायच असत,
छोट्याशा कारणाने कधी रुसायच नसत,
कारण जिवणात प्रेम हे एकदाच करायच असत.....



प्रेम हे खर तर चड्डीत झालेल्या शूशु सारखा असत .............
दुसऱ्यानला ते फ़क्त दिसून येत आणि जमल्यास वास,
पण तो ओलावा , तो थंडावा , तो स्पर्श फ़क्त स्वतालाच जाणवू शकतो

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.

मुली एकमेकाला भेटतात
तेव्हा.
Hi,कशी आहेस?आज या ड्रेस मधे छान
दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला
...:बावळट आहे ती,मला अजिबात
नाही आवडत.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते,कमि ने फोन करने को टाइम
नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर
सोबतच्या मित्राला.. He is my Best
Friend!!!!
Moral:मुली तोंडावर गोड बोलतात पण
त्यांचे मन काळे असते..तर मुलगे
बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे
असता

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.

मुली एकमेकाला भेटतात
तेव्हा.
Hi,कशी आहेस?आज या ड्रेस मधे छान
दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला
...:बावळट आहे ती,मला अजिबात
नाही आवडत.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते,कमि ने फोन करने को टाइम
नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर
सोबतच्या मित्राला.. He is my Best
Friend!!!!
Moral:मुली तोंडावर गोड बोलतात पण
त्यांचे मन काळे असते..तर मुलगे
बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे
असता

"माझिया प्रियाला प्रीतच कळेना "

प्रेम हे दोन जिवांच नात असत,
दोघांनी ते समजावून घ्यायच असत,
छोट्याशा कारणाने कधी रुसायच नसत,
कारण जिवणात प्रेम हे एकदाच करायच असत.....




गेलो होतो परीक्षेला तिथे काही आठवेना
गेलो होतो परीक्षेला तिथे काही आठवेना
काय सांगू त्या सरांना कि
"माझिया प्रियाला प्रीतच कळेना "


प्रेम हे खर तर चड्डीत झालेल्या शूशु सारखा असत .............
दुसऱ्यानला ते फ़क्त दिसून येत आणि जमल्यास वास,
पण तो ओलावा , तो थंडावा , तो स्पर्श फ़क्त स्वतालाच जाणवू शकतो

मराठी प्रपोज:

मराठी प्रपोज:
तु माझी नसलीस तरीँ
मि तुझा आहे...

तु माझी नसलीस तरीँ
मि तुझा आहे...
कारण तु महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र माझा आहे..

सोनं नसतं मन्

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
पण् जे चकाकतं ते प्रत्येक्
वेळीच् सोनं नसतं मन्
आपलं वेडं असतं वेडं
आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं...???????.

मी असाचं आहे,

मी असाचं आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वांत असाताना देखील,
स्वतःच्या शोधात फिरणारा..!!

मी असाचं आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा..!!

मी असाचं आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा..!!

मी असाचं आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसता हसता
नियतीला लाजवणारा..!!

मी असाचं आहे,
इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतः मात्र,
काळोखात आटणारा..!!

मी असाचं आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा..!!

" आकर्षण "

पाहताक्षणी एखादी व्यक्ति
आवडणं हे " आकर्षण " असतं
परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो ,
त्या व्यक्तिच्या जवळून
जाण्याची इच्छा असणं ही
..." ओढ " असते ,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं
हा " अनुभव " असतो
आणी त्या व्यक्तिला तिच्या
गुणदोषांसह स्विकारणं हेच
खरं " प्रेम " असतं ..!!

गुरुवार, २८ जुलै, २०११

आमोल

आ- आवडता नेता
मो- मोल ज्याचे सर्वांसाठी
ल - लळा लावतो सर्वांला
असा हा आमोल

" आकर्षण "

पाहताक्षणी एखादी व्यक्ति
आवडणं हे " आकर्षण " असतं
परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो ,
त्या व्यक्तिच्या जवळून
जाण्याची इच्छा असणं ही
..." ओढ " असते ,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं
हा " अनुभव " असतो
आणी त्या व्यक्तिला तिच्या
गुणदोषांसह स्विकारणं हेच
खरं " प्रेम " असतं ..!!

प्रश्नच प्रश्न.. सैरभैर

पून्हा एकदा
आरोप प्रत्यारोप
रोख नेमका पण
प्रश्नच प्रश्न.. सैरभैर
तू हवासच.. गुन्हेगार लागतोच केस चालवताना
तूच नकोस.. सग्गळं तुझ्यामुळेच झालं
प्रचंड रोष अगदी जळजळणारा
अव्यक्त आकांत.. कानाठाळ्या बसवणारा...
..कित्ती काही मावतं नाही दोन डोळ्यात.. पूढे मात्र

थरथरत्या बंद ओठांवर एक ओघळ... अन.. गून्हा कबूल... पून्हा एकदा!!!

काही केल्या प्रश्न सुटेना,

हे मेघ दाट दाटूनी आले
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.

कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?


कुठेच काही पर्याय दिसेना
.काही केल्या प्रश्न सुटेना,
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.

आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!

मी बोलत राहिलो हुरळून.

मी बोलत राहिलो हुरळून.. सांगत राहिलो,
"किती छान दिसतय सगळं ईथून
ते दूरवर पसरलेले डोंगर.. गर्द हिरवे आच्छादन
नुकतीच दवात न्हावून निघालेली पाने
त्या तळयाचं निळशार पाणी.. लाजरे तरंग त्यावर
मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी
सगळं कस मनमोहक.. आल्हाददायक..."
तु तेंव्हाच स्तब्ध निर्विकार स्वरात उत्तरलीस,
"किती ओसाड दिसतय आजूबाजूला,
दूरवर कोणीच कस नाहिये.. कुठेच..
पारदर्शकता कमी झालीये बघ पाण्याची.
पाऊसही जरा प्रमाणात पडायला हवा,
हे काय.. जिकडे तिकडे चिक चिक नुसती..
जरा पाय ठेवायला जागा नाही कुठेच.
ह्यालाच का निसर्ग निसर्ग म्हणून डोक्यावर घ्यायचं."
मी चित्राकडे बोट करत विचारलं,
"ईकडेच पहाते आहेस ना तु?"
तुझं स्वयंचलित उत्तर लगेच आलं,
"एवढं महागड तिकिट काढून आलो ना प्रदर्शनाला,
मग दुसरे कुठे बघणार मी? मोजमापच नाही कुठल्या गोष्टीला,
ना पावसाला, ना चित्राला, ना काढणार्‍याच्या वेळेला, ना तिकिटाला."

सांग ना राधे तू रूसलीस का

सांग ना राधे तू रूसलीस का
मुख फिरवून गं बसलीस का

आभास झाला का मोहनाचा
चुकला का ठोका काळजाचा
तूझ्याच हाकेला ओ देईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं

किती वाट पाहशील श्रीरंगाची
किती ओढ लागली नभरंगाची

तो जाहला असे कोठेसे दंग
सर्वास प्रिय असे त्याचा संग
तरी तयाची सानिका तूच गं
साद देवूनी पहा तो येईल गं

असेल खट्याळ हसू तव नयनी
बघेल जरी तो जाई मन मोहुनी

मनी कृष्णी नाव तुझेच राधे
झुरे ते तर तुझ्यासाठीच राधे
येई तो जवळ तूला घेईल गं
साद देवूनी पहा तो येईल गं

सखे

तूझ्याच सारखे नटते, थटते
अन नभी चांदणे ते लखखते
परि वेड्यास कसे कळत नाही
त्यास तुझी सर कधी येत नाही

ह्या प्राजक्तानेही तसेच करावे
वेळी अवेळी असे गंधाळून जावे
त्यालाही न कसे एवढे उमजावे
तूज श्वासगंधाने तो भारून जाये

कधी अबोलीही असेच वागते
नाजूकतेला ती ही दाद मागते
पण ती तर नेहमी हेच सांगते
तूज स्पर्शाचे तिज अप्रूप वाटते

सृष्टीसुद्धा वेडावते सहवासात तूझ्या
मग मी तरी स्वतःस सावरणार कसे
सखे गंधाळून स्पर्शतेस मनास माझ्या
मी स्वतःस कुठवर व आवरणार कसे

प्रेमात पडू शकतो कोणीही.

प्रेम... प्रेम ही नुसती संकल्पना नव्हे तर तेच जीवन आहे अर्थात ज्याने त्याच्या विशुद्ध स्वरूपाचा अनुभव घेतला ती कोणतीही व्यक्ती होकारवजा मान हलवून हे मान्य करून टाकेल. अता प्रेम म्हणजे काय हे असले प्रश्न मनात येणं सहाजिक आहे पण एक लक्षात ठेवून चाललं पाहिजे की जिथे बुद्धी हात टेकते तिथून तर प्रेम अनुभवण्याला सुरूवात होते. ते असं शब्दात वगैरे सांगणं म्हणजे तहान लागणे म्हणजे काय होतं हे अशास्त्रीय भाषेत समजावण्याइतकच अवघड आहे. हा तर फक्त अनुभूतीचा भाग! एखाद्या स्वप्नाच्या, ध्येयाच्या किंवा अगदी कश्याच्याही प्रेमात पडू शकतो कोणीही. आपापल्या भावविश्वावर अवलंबून आहे की कोणाला काय भिडतं. एक अनुभव मात्र नक्की नक्की येतो प्रेमात अन तो म्हणजे 'जगावेगळं काहीतरी गमवल्याशिवाय जगावेगळं काहीतरी मिळत नाही!'

आयुष्यावर बोलू कही

आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तुझ्या
गालावर पडणारी खळी...
तुला मात्र तुझं हसणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तुझे
ते तिखट अश्रू...
तुला मात्र तुझं रडणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं आपण
एकदा पावसात भिजलो होतो...
तुला मात्र तो पाऊस
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं दिलं होतं
गुलाबाचं फ़ुल...
तुला मात्र त्याचा रंग
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तु
एकदा रुसली होतीस...
तुला मात्र माझं रागवणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं आपण
खुप भाडायचो...
तुला मात्र माझं भाडंण
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

आयुष्य हे एक रांगोळीच आहे..

प्रश्नांनी प्रश्नांना प्रश्न विचारले,
प्रश्नांनी प्रश्नातच उत्तर दिले,
प्रश्नांच्या या प्रश्नावलीने,
प्रश्नांचेच प्रश्नात रुपांतर झाले..

तुझ्या काळजाची धक धक,
मला पाहताच वाढते..
मी तुला भेटलो की,
माझ्या सोबतही असेच काही घडते..


तुझ्या रेशमी पदरात,
सुख आहे त्या चंद्र चांदण्यांचे,
सखे तुझ्या उश्याशीच तर..
मरण मला सुखाचे..

तुला कधीच कळाले नाही..
ते प्रेमाचे तीन शब्द..
तु फ़क्त बाजार मांडलास..
ज्या पुढे तु हि निशब्द...


आयुष्य हे एक रांगोळीच आहे..
त्यात कोणते रंग भरायचे हे आपणच ठरवायचे..
एखादा चुकीचा रंग भरला तर..
संपूर्ण रांगोळीची सुबकता निघून जाते..

माझे सर्वच प्रश्न..
तुला कोड्यात टाकतात..
त्यांची उत्तरे शोधताना..
तुला माझ्या जवळ आणतात..


खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......

तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!


पाऊस यावा पण महापुरासारखा नको,
वारा यावा पण वादळासारखा नको,
आमची आठवण काढा पण
अमावस्या पोर्णिमेसारखी नको..!!


मनकवडी तू मनमोहिनी
केलीस माझ्या मनाशी समेट,
आहेस तू मनाने मनाला दिलेली
मनासारखी मनमोहक भेट..!!


एवढे कच्चे नव्हते ते बंध..
ज्यांनी आपल्या हृदयाला बांधले होते..
सहज कसे तुटून जातील..
त्यात आपले मर्मबंध गुंतले होते...


आता पुन्हा मला..
शून्यातून उभारावे लागेल..
त्यात तरी मला..
तुझी साथ लाभेल...?


ऋतू बदलत असले,
तरी दिवस तेच राहतात..
एकदा निघून गेले ऋतू,
पुन्हा येत असतात..
आमोल घायाळ

निखारे निखारे ते चहुऔर सारे

निखारे निखारे ते चहुऔर सारे
पापण्याचे उठतील ओले पहारे
हे सांग वणवे कुण्या मालकीचे
आकाश तू झाकले नागडेच तारे

का जाणता मोडले नदीस त्या
का रेखिले तू बंध मोडके किनारे
तळास त्या जीव तगमगता असा
स्पर्शता नीर ते जागतील शहारे

मोजता दिशांना चुकशील जरासा
धरता मुठीत त्यांना पळतील वारे
तेज पुंज ते विझले शितीजा वरती
प्रकाशास ठाव दिसेना पुसे अंधारे

निसर्गास अश्या तळवे लाभले हिरवे
सरी गिळूनी तडे ते जमिनीवरी वावरे
घे लपेटून येथे जेवढे जेथे मिळाले
लाजाळूच तो स्पर्शता त्याला पसारा आवारे


आमोल घायाळ

प्रेमपत्र पहिले लिहिताना

प्रेमपत्र पहिले लिहिताना वेळ लागतो
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...

'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...

धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...

उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...
आमोल घायाळ

ती एक वेडी होती ...

ती एक वेडी होती.............
दोघ एकत्र बसायचे अन् खुप बोलायाचे ...
शणात रुसयाचे अन् शणात हसायचे ....
एकमेकाशी बोलायाचे नाही ठरवायचे अन पटकन बोलुन ही जायचे ....
ती त्याच्यात गुंतलेली अन तो अनेकात् गुंतलेला ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......

ती खुदकन हसे अन हलूवार डोळे त्याच्यासाठी ओलेही करे .....
पापण्यांच्या आडून चोरून ती बघे अन स्वतःच्या वेडेपनावर खालालुन हसे ......
ती त्याचाच तासनतास विचार करी अन तो तो तिलाच वेडी म्हणुन जाई ....
तिच्यासाठी तो बराच कही जाला अन ती मात्र त्याच्यासाठी फक्त टाइमपास होई ....
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ......

ती शांत सागर लाट अन तो एक उफलालेला सागर ....
ती एकनिष्ट पतंग अन तो एक बेफाम भ्रमर ....
ती स्वतः अधि त्याचा विचार करायची अन् तो फक्त त्याचाच विचार करायचा ....
ती त्याच्याकडे कधीच अपेक्षा नहीं करणार अन् तो तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण नाही करणार ...
तरीही तिला तो आवडायचा ...... का???
कारण ......
ती एक वेडी होती ...

ते दोन सुखद क्षण

हात माझा हातात घेऊन सख्या

तू सांगतो म्हणालास भविष्य

अरे वेड्या ,पण हात हातात गुंफून

बघ चाललाय आपलच आयुष्य !!!!!!!!!!


तुला पाहताच मनी
खेळ भावनांचा दाटला,
तुझ्या एकाच कटाक्षाने
प्रेमाग्नी हा पेटला..!!


अजून सोडली नाही आशा..
तू परत येण्याची..
अजूनही तिथे वाट पाहतो तुझी..
जिथे सुरवात झाली आपल्या प्रेमाची..




तुझ्याचं साठी सखे
नभी हे शरदाचं चांदण,
ताऱ्यांमध्ये चंद्र जणू
कपाळीचं गोंदण..!!


आज ची रात्र,
मला खुपच छळतेय,
पुन्हा तुझी आठवणीत,
मन माझे जाळतेय...


अधिर मन झाले माझे,
अधिर झाल्या चांदण्या,
वाट पाहूनी तुझी,
किती भिजूनी गेल्या पापण्या..


ते दोन सुखद क्षण
काळजात रुतुन आहेत..
ते हि वेडे तुझी,
वाट पाहत गपचुप बसुन आहेत..




असतात काही प्रश्न,
कधीच न सुटण्या साठी,
त्यांना तिथेच सोडून द्यावे,
प्रश्नालाही प्रश्नात गुंतण्यासाठी..

काय तरी मिळत प्रेमात पडून

काय तरी मिळत प्रेमात पडून दुख वेदना आणि पश्चातापाचा आहेर,
तरुण मन म्हणे हेच दिवस आहेत कधीतरी पडा रे यातून बाहेर..!!

उबग येत नाही का रे तुम्हाला तेच तेच नखरे नि हट्ट झेलण,
जीव ओवाळून टाकण आणि खोट वाटावं इतक गोड बोलण..!!

सरळ सरळ प्रक्टिकल वागावं का भाव द्यावा फुकटचा मनाला,
त्याला अक्कल नसते तेच तर भाग पाडत प्रेमात पडायला..!!

खूपचं उत्तम जर जमलं ठेवायला रंगात रंगुंनी रंग आपला वेगळा,
मला तर वाटत सुखी होण्यासाठी बिनधास्त वापरावा हाच फॉर्म्युला..!!

आधार मिळतो म्हणे जीवाला भावनिक संकटांच्या वेळी सावरायला,
लहान का असता तुम्ही येत नाही का स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरायला..!!

खरंच असत का प्रेम मैलाचा दगड आणि टिकणार शाश्वत चिरकाल,
गेलेत ते दिवस कायमसाठी राहिल्यात त्या फक्त आठवणी आजकाल..!!

एकचं तर जीव असतो आपल्याकडे का तो कुणाला लावून फसायचं,
घरचंच का कमी असतं त्यात दुसऱ्याचं घोड फुकटच पोसायचं..!!

धन्यवाद देतो बाप्पाला त्याने ठेवलंय मला "पुन्हा" प्रेमात पडण्यापासून दूर,
पण बघून दोन चिमण्या जीवांना आजही मनात का बर उठतो काहूर..!!

आमोल घायाळ

जीव घेवून गेले ते घारे डोळे

जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
भेट होती नेरुल स्टेशनला ठरलेली
कोण पोहोचेल अगोदर त्यासाठी शर्यत चाललेली
मी होतो पनवेल स्टेशनावर
पकडायची होती ११.४२ ची सि एस टी
मेगा ब्लोक असल्यामुळे झाली ती रद्द
पण मी मात्र होतो भेटीसाठी पूर्णपणे सज्ज
१२.०५ ची सि एस टी पकडून पोहोचलो मी ४ नंबर फलाटावर
ती माझ्या आधीच पोहोचलेली होती दोन नंबरवर
तिने हाय केले न हेल्लो अस वाटलाच नाही कि आहे पहिली भेट
म्हणाली मला लगेच पोहोचायचं आहे घरी थेट
तिला थांबवण्यासाठी काही वेळ सोबत घालवण्यासाठी मी केला प्रयत्न खूप
ब्यागेतील सामान दाखवून , चोकलेट देवून , नको नको ते करून थांबवू पहिले खूप
१२.३५ ची ठाणे लागली होती घाई घाईत गेली तिच्यात बसून
हीच होती ती माझी अनपेक्षित भेट जिचे होते घारे डोळे
जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
आमोल घायाळ

ती एक नाजूक परी.

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात
तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...
आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही
जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...


मनात माझ्या तुझ्याच तर ,
प्रेमाची छाया ''प्रतिबिंब'' आहे....
मग मी तुला विसरेन तरी कसा,
माझे अस्तित्वच तुझ्यात ''वसले''आहे ....!!



मनाच्या नाजूक तारा झेडणारी,
ती एक नाजूक परी........
चूक तिची न माझी पण,
मनाला "जखम" झाली खरी..

बुधवार, २७ जुलै, २०११

चारोळी

ओल्या त्या पावसात मी चिंब...
मिठीत तुझ्या भिजलेले अंग...
तुझ्या श्वासात माझा श्वास...अन
पुन्हा पावसात भिजताना फक्त भास तुझा .

त्या भर पावसात
तुझी होती सोबत ...
म्हणून मी केली
थोडीशी गम्मत ..

तू आलास की,
पाऊस पड़ायचा ,
पुढचा प्रवास ,
आपोआप घड़ायचा.....


कळणार नाही माझ्यासोबत
घडणारा प्रवास तुला ...
क्षणोक्षणी देत जाईन
आनंदाची बरसात तुला ...


टीम टीमणारा दिवा..
काळोख छेडून जातो..
एवढासा तो दिवा पण..
आपल्याला अंधारातून प्रकाशात नेतो..


पावसाला पण कळतेय आता..
आपल्या वेड्या मनाची व्यथा..
तो हि वेडा आधीच बरसायला लागतो..
जेव्हा करतो आपण आपल्या भेटीची सांगता..


श्रावणाची लागली चाहूल..
झिम्माड झाली राने वने..
झाडांवरी फुलू लागली..
नवी पालवी नवी पाने..

रिमझिम पावसात

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात
तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...
आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही
जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...


कळणार नाही माझ्यासोबत
घडणारा प्रवास तुला ...
क्षणोक्षणी देत जाईन
आनंदाची बरसात तुला ...

"तसे फार नाही..."

चालती पाऊले.........मन ते का तयार नाही
दुरावे तिच्या माझ्यातले..... तसे फार नाही

आठवणी असुनी चित्ती.. वाटे का आधार नाही
आसवांचे अबोली शब्द.. नयनी तसे फार नाही

हरवले क्षण मोरपंखी..इथे सुखाचा बाजार नाही
तुटक्या हृदयास माझ्या.... हवे तसे फार नाही

साद घालता आर्त ती... आता तू त्या पार नाही
मोजकेच होते शब्द ओठी मजकडे तसे फार नाही

मज मंजूर ना प्रारब्धा.. हा असा माझा सार नाही
भावना कळू दे तिला बाकी मागणे तसे फार नाही

जीव घेवून गेले ते घारे डोळे

जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
भेट होती नेरुल स्टेशनला ठरलेली
कोण पोहोचेल अगोदर त्यासाठी शर्यत चाललेली
मी होतो घणसोली स्टेशनावर
पकडायची होती ११.४२ ची पनवेल स्लो
मेगा ब्लोक असल्यामुळे झाली ती रद्द
पण मी मात्र होतो भेटीसाठी पूर्णपणे सज्ज
१२.०५ ची पनवेल पकडून पोहोचलो मी चार नंबर फलाटावर
ती माझ्या आधीच पोहोचलेली होती दोन नंबरवर
तिने हाय केले न हेल्लो अस वाटलाच नाही कि आहे पहिली भेट
म्हणाली मला लगेच पोहोचायचं आहे घरी थेट
तिला थांबवण्यासाठी काही वेळ सोबत घालवण्यासाठी मी केला प्रयत्न खूप
ब्यागेतील सामान दाखवून , चोकलेट देवून , नको नको ते करून थांबवू पहिले खूप
१२.३५ ची सी एस टी लागली होती घाई घाईत गेली तिच्यात बसून
हीच होती ती माझी अनपेक्षित भेट जिचे होते घारे डोळे
जीव घेवून गेले ते घारे डोळे
एक अनपेक्षित भेटीसाठी चालले होते सर्व चाळे
आमोल घायाळ

मंगळवार, २६ जुलै, २०११

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलीच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री.......

सोमवार, २५ जुलै, २०११

आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...

ढगाळ आकाश अन..
गार वारा सुटलेला..
तुझ्या आठवणींचा मनात..
पाऊस दाटलेला..

ढगाळलेल आकाश..
मला पाहून हसलं..
वारा गुदगुल्या करू लागला..
अन माझं मन फसलं..

आकाशातून हळूच एक थेंब..
माझ्या हातावर आला..
त्याचा तो स्पर्श तेव्हा..
तुझी आठवण देऊन गेला..

वारा खट्याळ वेड्यासारखा..
पावसा सोबत खेळू लागला..
तुझ्या आठवणीही मग..
मनात मला वेधू लागल्या..

हळूच तुझा आवाज..
काना मध्ये घुमू लागला..
तू जवळ असल्याच भास होऊन..
पाऊस जोरात कोसळू लागला..

माझ्या मनात तुझा अन तुझ्या मनात माझा..
हळुवार गारवा दाटत होता...
तेव्हाच आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...
आपले थेंब वाटत होता..

रविवार, २४ जुलै, २०११

सगळे असून आज मी एकटा

सगळे असून आज मी एकटा
देवा सांग रे माझा अपराध,
तोडून नेताना माझ्या प्रेमाच्या माणसांना
मलाही घ्यायचं होतस ना उदरात..!!

सगळी सुख जरी दारी उभी अन
आनंद जल्लोषाचा माहोल पुरा,
जीवनाच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर
तुमच्याविना मी कायम अधुरा..!!

मातीचा गोळा घडवत गेलात
घालून माया ममतेचं शिंपण,
दैवाचा फेरा भेदून गेला अकस्मात
दोन जीवांचं ह्या जीवासाठीचं कुंपण..!!

नियतीचा हा नियम मान्य पण निर्माण
करतो आयुष्याभरासाठीची निर्वात पोकळी,
आपल्या माणसांची जागा कुणी घेईल कि
जन्मभर राहणार ती अशीच मोकळी..!!

आतुरतेने प्रतीक्षा आता वाटत
कुणीतरी हक्काचं आपलं असं असावं,
खोट हसून जीव थकला आता
कधीतरी जरा खर खरंही हसावं..!!

आठवतेस तू...

न चुकता करावा तुला फोन
मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...
याक्षणी आठवतेस तू...
फोन हाती घेतल्यावर बघावा
तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा...
याक्षणी आठवतेस तू...

एखाद्या दिवशी पहावी वाट
करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तू...

तुझं नेहमीच खट्याळ बोलणं
माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं...
याक्षणी आठवतेस तू...
तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट
माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं...
याक्षणी आठवतेस तू...

मित्र म्हणून काय नाही केलस तू
माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तू...
नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं
माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तू...

डोळ्यातील अश्रूही थाबेना आज
रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तू...

"मैत्री आपली मनात जपलीस
कधी सावलीत, कधी ऊन्हात तापली
कधी फुलात, कधी काट्यात रूतली
तरीही तू ती मनात जपलीस..."
याक्षणी आठवतेस तू
...

थेंब अश्रुंचे दोन गालावर

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

टीम टीम तारे आभाळी...

तुझं अस्तित्व अजूनही जाणवते मला..
तू दूर असलीस तरी तुझी आठवण खुणावते मला..
फरक कुठे पडला कि तू माझी नाहीस...
जाताना तू जे अश्रू गाळलेस तेच अजूनही सुखावतात मला..


टीम टीम तारे आभाळी...
चंद्रकोर शोभतेय भारी..
आता रात्र फार झाली..
चला जाऊन झोपा आपल्या घरी..

तुझी सोबत असताना

आठवते अजूनही तुझ्या
माझ्यातलं भांडण वादळी
मिठीत विसावताच पुन्हा
खुलणारी तुझी कळी
मन जेव्हा गुंतून जातं
नकळत आठवणीत
तुझ्या माझ्या नात्याचं
उलगडतं हळूच गुपित 


मावळतीचा सूर्यही
जेव्हा प्रेमरंगी रंगतो
नाद तुझ्या आठवांचा
हळूच कानी गुंजतो

काल काळजाशी तुझ्या
आठवणी भांडल्या
झोपताना कुशीवर
डोळ्यातून सांडल्या

तुझी सोबत असताना
मी शब्दच विसरतो
तुझ्या डोळ्यातले भाव
मी शब्दाविनाच वाचतो

शब्दाविना सखे तू
डोळ्यातून बोलतेस
आधी दूर जाऊन मग
आठवणीतून छेडतेस.

ऐलतीर अन पैलतीर
मध्ये आयुष्य चालले
ओढ जीवाला सतावे
वेड्या आशेला लागले

कसे संपावे मीपण
कसा मिळावा किनारा
वाहणाऱ्या या पाण्याला
दोन बाजूंचा आसरा

दोन टोके संसाराची
एक तू अन एक मी
साथ देऊ चालताना
संसारी मग काय कमी

तुझ्यावीण आयुष्य कठीण आहे मला
हे तू चांगल्याप्रकारे जाणतेस ...
तरी ही अशी तू दूर जावून
माझ्या मनाशी का ग खेळतेस ....


 कुणास ठाऊक का
आज मला चंद्र व्हावेसे वाटतेय..
ढगा आड लपून गपचूप...
तुला पाहावेसे वाटतेय..


पावसाने आज ...
कमालच केली.....
निसर्ग फुलवायला त्याने..
चक्क पगाराची मागणी केली..

अधीर मनातून बरसलेल्या..
त्या शब्दांकडे निरखून बघ.
अजून हि तुझ्या वाटेवर..
तुझ्या येण्याची प्रतीक्षा करताहेत बघ..













एका 'त्या'ची , एका 'ति'ची,

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या , गुलाबाची ....

प्रेम का मैत्री.

प्रेम म्हणजे LOVE

L+O+V+E = 54

12+15+22+5 = 54

आणि मैत्री म्हणजे FRIENDSHIP

F+R+I+E+N+D+S+H+I+P = 108

6+18+9+5+14+4+9+8+9+16 = 108

काय बरोबर ना ..!

कळलं का काही.....!!

मैत्री ही

प्रेमाच्या दुप्पट असते...!

तुम्हाला काय आवडेल...........?

प्रेम का मैत्री...................???

गुरुवार, २१ जुलै, २०११

मराठी चारोळ्या

तुझ रोज लाडाने माझ्यावर..
जेवढी रुसत जातेस...
खरे सांगू प्रिये...
तेवढीच माझ्या हृदयात फसत जातेस..








रुसणे आणि रागावणे..
यातले फरक मला कधी कळलेच नाही..
मी वेड्यासारखे मनाचे ऐकले..
हृदयाने साद घातली पण मन त्याकडे वळलेच नाही..

मला हि वाटले..
आपणही थोडे रुसावे..
मग तू माझी समजूत काढून..
पुन्हा मिठीत येऊन बसावे..


आता माझा प्रत्येक शब्द...
अर्थहीन वाटतोय...
तुझ्या पसंती शिवाय असा आहे..
कि पाण्याविना मासा जगतोय..

तुझे खोटे खोटे रुसनेच...
माझ्या हृदयावर घाव करून गेले..
मी मात्र त्याला समजलो नाही..
अन आपल्या नात्यावर घाव मारून दिले..


आज काल माझे डोळे..
रात्रीचे मिटतच नाहीत..
उघड्या डोळ्यांनी पाहतो नभात...
पण tare कधी डोळ्यात उतरतच नाहीत..

तुझ्या आणि माझ्यातले अंतर,
नदीच्या दोन किनाऱ्यांचे,
ते मिटवायचे सामर्थ्य फक्त..
आठवणींच्या प्रवाहाचे..


शहारा आणतो ग तुझा स्पर्श ,
शिरतेस तू जेव्हा मिठीत माझ्या ,
आवर घाल ग तुझ्या स्पर्शाला ,
कळतंय काय आहे मनात तुझ्या . . .
                                                     आमोल घायाळ

कुणास ठाऊक...?

या पुढे मी तुला... कधी..
भेटेन कि नाही कुणास ठाऊक..?
अन भेटलो तरी...पहिल्यासारखी..
मैत्री दाटेल कि नाही कुणास ठाऊक...?

तुझ्या नजरेला नजर..
मिळवता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
पुन्हा तुझ्या डोळ्यातील अश्रू..
पुसता येतील कि नाही कुणास ठाऊक...?

तू आता माझ्या सोबत..
गप्पा मारशील कि नाही कुणास ठाऊक...?
त्या गप्पांमध्ये पुन्हा आपण..
हरवून जाऊ कि नाही कुणास ठाऊक...?

तुझ्या प्रत्येक शब्दाला आता..
प्रतिशब्द देता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
तुझ्या प्रत्येक वाक्यावर..आता
मला सल्ला देता येईल कि नाही कुणास ठाऊक...?

तू कधी रुसलीस कि..
तुझी समजूत काढता येईल कि नाही कुणास ठाऊक...?
अन मी समजूत काढली तरी,
तुझा रुसवा जाईल कि नाही कुणास ठाऊक...?

आता पर्यंत समजून घेतलेस..
या पुढे समजून घेशील कि नाही..कुणास ठाऊक...?
                                                         आमोल घायाळ

मंगळवार, १९ जुलै, २०११

मराठी चारोळ्या

आजची संध्याकाळ...
काही वेगळीच वाटतेय...
तुला पुन्हा भेटायची...
आशा मनात दाटतेय...


शब्दाच्या या जाळ्यामध्ये...
गुरफटून गेलो असा...
समुद्रातील मासा..
जाळ्यात अडकतो जसा...



आज कुणास ठाऊक का ..?
माझे शब्दच हरवून गेलेत..
भूतकाळातले काही क्षण..
पुन्हा परतून आलेत..


पुन्हा एकदा जगण्याची...
आस देऊन गेले कुणी तरी...
पुन्हा एकदा जाता जाता..
"मृगजळ" दाखवून गेले कुणी तरी..



तू आठवण काढताच माझी..
मला उचकी लागते...
दोघांना हि आठवण आली कि..
आपली भेट होते..


जीवनाची श्री गणेशाने होते सुरुवात..
हे राम ने होतो शेवट,
परंतु मध्यंतरीच्या काळात असते..
कृष्ण कृत्याचं सावट...


कवितेच्या प्रत्येक ओळीत..
तुझ्या सोबतचे क्षण गिरवतो..
तुझ्या रोजच्या बोलण्यातही..
कवितेच्या ओळी जुळवतो.. 



प्रत्येकाचे अक्षर वळणदार नसते.
प्रत्येक जन सुंदर लिहितोच असे नाही..
तुम्ही लिहिताना काय लिहिता या पेक्षा...
तुम्ही लिहिलेले किती समजते हे महत्वाचे...


रात्रीचे चांदणे लुकलुकतय आभाळी..
सुंदर अशी चंद्रकोर हसतेय गाली..
थंड गार वाऱ्याची येतेय हळूच झुळूक..
एक पावसाची सर येऊन वाऱ्याला देतेय चुणूक.


जीवनातील प्रत्येक आठवण..
एका भरोश्यावर स्थिर असते..
म्हणून प्रत्येक क्षण मनापासून जगवा ....
त्यावर जास्त दडपण येताच आठवणींना चीर जाते.


चराग जलता तो जलने दो..
कोई याद आता हें तो आने दो..
गम के साये तो परछाई बने फिरते है..
अभी ईन गमो के ही हम ज्यादा पास राहते है.. ..


आज आकाशातील चंद्र.
काहीसा रुसलेला वाटतोय,
नभा आड दडून तो...
कुणासाठी रडतोय...


शब्दांच्या पावसात..
मन चिंब भिजून जाते...
उमगलेले सर्व काही...
शब्दांमध्ये वाहून जाते..


                 आमोल घायाळ

सोमवार, १८ जुलै, २०११

हवं असतं कुणीतरी .........

हवं असतं कुणीतरी तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं
हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं
खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं कुणीतरी
कडाडुन भांडणारं
सारं भांडुन झाल्यावर
मायेनं बिलगणारं

आला आला श्रावण आला..

बहरेल माझे आयुष्य..
माझ्या हातात तुझा हात दे..
करू प्रत्येक स्वप्न पूर्ण जीवनात..
प्रत्येक वळणावर तू अशीच साथ दे..

आला आला श्रावण आला...
घेऊन पुन्हा हर्ष नवा..
पक्षी गाती गीत नवे ..
झाडांवरती फुलती थवे...
 .


पावसाचे धरणीशी नाते,
आहे किती विसंगत...
एकमेकांशी दूर राहून हि...
फुलून येते एका थेंबात...


आज पावसाने खरच,
एक गम्मत केली...
स्वतःच्या थेंबानी भरलेली नदी...
स्वतःच वाहून नेली..



घन आभाळीचा तडकावा..
मातीस मिळावा शिडकावा..
झाडावरती पुन्हा नव्याने..
हिरवा रंग फडकावा..



विसरू नको रे आई बापाला..
झीझवली ज्यांनी काया...
मिळणार नाही वेड्या..
आई बापाची माया..

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे

प्रत्येक झाड डोलू लागले..
नव्या या पालवीने..
हे सुंदर सुख आणले आहे.
बरसणाऱ्या पावसाने...




श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

जळत रहातो पाऊस

आता आत बाहेर जळत रहातो पाऊस
पुन्हा जखमा ओल्या करत रहातो पाऊस

तुझ्या आठवात कधी तुझ्या विचारात
गाणं तेच तेच म्हणत रहातो पाऊस

चाहूल न लागे , जोवर तुझ्या पावलांची
कसा नभातच झुरत रहातो पाऊस

किती तुज स्पर्शिल्या, अन किती पळ हुकल्या
हिशेब धाराधारांचा करत रहातो पाऊस

तुला न्यायचे पार त्या ढगांचा गावी
कल्पनेत आतल्या आत भिजत रहातो पाऊस

पण पाहुन तव हात , हातात माझ्या
कसा डोंगरा आडूनच परत जातो पाऊस

सोडून तू गेलीस मज, त्या दिवसापासून
मृगातच हस्तासारखा पडत रहातो पाऊस

तुला निभवता नाही आले प्रेम त्या फुलाचे
चिखल चेहर्यावर उडवत रहातो पाऊस

अरे आता बरसणे नाही रे पूर्विसारखे
पांपण्यांवर मेघ ठेवून रडत रहातो पाऊस

हे नाते मैत्रीचे

माझ्या पासून दूर जाताना..
एक वचन देऊन जा...
माझे डोळे बंद होतील तेव्हा तरी...
मला शेवटचे पाहून जा.


तू होकार दिला असतास तर...
आयुष्य नक्कीच वाढले असते...
पण तुझ्या नकाराने...
ते तिथेच संपून गेले.


मुसळधार पावसात..
ती सोबत असावी...
दोन हृदये एक होऊन...
पावसासोबत बरसावी...


पहिल्याच भेटीत तुझे डोळे,
माझ्या डोळ्यांशी बोलत होते...
शेवटच्या भेटीत मात्र...
ते लपंडाव खेळत होते...



आकाशातील इंद्रधनुष्य,
असते सप्त रंगात रंगलेले ..
माझ्या प्रियेचे जीवन असू दे..
त्या इंद्रधनुच्या रंगात रंगलेले..



काहीसे वेगळेच असते,
काहीसे वेगळेच असते,
हे नाते मैत्रीचे ..
अनोळखी अशी मने...
एकमेकांना वाटतात आपलेसे..
अनोळखी अशी मने...
एकमेकांना वाटतात आपलेसे..

गुरुवार, १४ जुलै, २०११

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......


"Half the truth is often the whole lie"


तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

1४ फेब्रुवारी चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या 1४ फेब्रुवारीला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....
continue.....


ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.

1४ फेब्रुवारी तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि
. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.....
आधी विचार करा, मग कृती करा!!!

आकर्षण

आकर्षण

एक युवक अन एक युवती
दोघांची एकदा भेट झाली
एकमेकांच्या तरूण सौंदर्याला भाळली
तिच्या नाजूकपणाची त्याला छाप पडली
त्याच्या धाडसीपणाला ती मोहरली
प्रेम समजून आकर्षणात गुंतली
संसाराच्या स्वप्नात रंगू लागली
विवाहाच्या पिंजर्यात अडकली
एक दोन वर्ष मौजमजेत गेली
तो बाबा अन ती आईही झाली
जबाबदार्यांची ओझी पडली
विचार्-मतामध्ये चिर पडू लागली
अवगुणांची आता छाप पडू लागली
कर्तव्याची उणीव भासू लागली
"
माझेच खरे" ह्या शब्दाने उचल खाल्ली
एकमेकांची सोबत नकोशी झाली
घटस्पोटाची नोटीस दारात आली
त्याची तलवार बाळावर पडली
भितीची आसवे गालावर ओघळू लागली
माझे आई बाबा ही जाणिव त्यालाच राहीली
बाबा की आई आवडीची, निवड कोर्टाकडे गेली
आईची कुशी अन बाबांच्या खिश्याची निवड झाली
आई बाबांच्या प्रेमापासुन त्याची वाताहत झाली
आकर्षणाची जागा बाळाच्या कुपोषणाने घेतली

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय,
हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते,
पण कधी कुणाला उलगडलच नाही...

का जीव होतो वेडा पिसा,
 जेव्हा येते तिची आठवण
हृदयात केलेली असते तिच्या,
 छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...

मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा
असेही कधी वाटत नाही...

रात्री छानच असतात ...
तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ...
मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...

प्रेम कधी सफल होते तर कधी
होत नाही...
ते जीवनात कधीही सब कूछ नसत
पण तरीही हृदयाच्या  एका कोपर्‍यात
ते नेहमीच जपायाच असत...

प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार नाही,
पण त्या साठी हे जग
प्रेम करायचे कधीहि थांबणार नाही...
प्रेम करायचे कधीहि थांबणार नाही...

ती समोरून आली तरीही शब्दाना बांध फुटत नाहि

ती समोरून आली तरीही शब्दाना बांध फुटत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार करतोय ...
वही मागण्याशिवाय कधी बोललो नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...


माहित नाहि , ती मरते का नाहि माझ्यावर?
का तीच ह्रदय आहे ,फ़क्त एक "सजीव कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद आम्हालाही मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...



Valentine Day ला बूके घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच भागवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...



तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी , ह्रदय मात्र बोलत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...


 वाटतय , तिच्याही वहित असेल एखाद फुल माझ्यासाठी ,
का आहे ही भोळी समज या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

कथा सुकलेल्या गुलाबाची ...

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा  ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.