रविवार, ३१ जुलै, २०११

आठवणींच्या पावसाने

आठवणींच्या पावसाने ,
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….

सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….

आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा....!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा