गुरुवार, २८ जुलै, २०११

काही केल्या प्रश्न सुटेना,

हे मेघ दाट दाटूनी आले
अन तसेच दाटूनी थकले,
बरसण्यास नव्हते कारण
तसे वारेही नव्हते सुटले.

कोरडी सौदामीनी कडाडली,
ती आली तशीच निघून गेली.
प्रश्नच पडला हा नभाला कि,
वेळ बरसण्याची का निघून गेली?


कुठेच काही पर्याय दिसेना
.काही केल्या प्रश्न सुटेना,
भरून येता जड झालेल्या..
तव घनांना दिशाच गवसेना.

आपुल्या हातून काही घडले,
वा नेमके कुठे काय चुकले?
आपल्या पावसालाच कि काय,
दुज्या कुठल्या पावसाने लुटले..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा