मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

येतात काही अनोळखी माणसा जीवनात...

सायंकाळचा पाऊस...
धूंद धूंद होऊन बरसतो..
जसा काही त्याचा "थेंब"..
जमिनीला भेटण्यास तरसतो..

येतात काही अनोळखी माणसा जीवनात...
अडकतो कधी आपण हि मग मैत्री च्या बंधनात...!!
असा एक दिवस येतो, भेटायची ओढ वाढवतो....
रोजचे भेटणे मग, सहवासचा आनंद मिळवतो....!!
काही दिवस ठीक, नंतर मात्र कंटाळतो....
...काही करणे काढून मग एकमेकांना टाळतो....!!
प्रत्येकाला असा एखादा तरी अनुभव येतो...
पण खरा सांगा, कुणी मित्र बनवणे कधी का सोडतो ...??

धूंद पावसाळी ती संध्याकाळ..
हातात तूझा हात होता..
छत्री असूनही तूझा स्पर्श..
मला चिंब भिजवत होता..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा