सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

तुला पुन्हा भेटलो तर..

तुला पुन्हा भेटलो तर..
माझ्या मनाला आवरने कठीन जाईल..
अन तूझ्या भिजलेल्या डोळ्यांना..
सावरने कठीन जाईल..

मनापासून प्रेम करणा-याच आसाच होत असत
डोळ्यातल्या भावना तोंडापर्यंत येऊनही बोलण्याच धाडस होत नसत

न जुळलेल्या नात्याला एवढे जपायचे असते
न जुळतच तुटेल म्हणून सांभाळायचे असते

आशा सांभाळण्याचे काय बरे साधणार
डोळ्यातले भाव तुमच्या कधी तिला सांगणार

साद तुमच्या प्रेमाला मिळेल किवा मिळणार नाही
किमान गप्प बसण्याची खंत तरी राहणार नाही

आग आहे प्रेम दुसरी काय उपमा द्यायची
जाळूनही यात नसते राख होऊ द्यायची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा