रातराणीला का रे सख्या
अत्तराची गरज असते?
कस्तुरी असता तिच्याच नभी
का ती सुगंधात न्हाऊन येते ?
युं तो बहोत ऐतबार किया उसपर मगर
सोचता हु क्या हासील किया अब तक ?
किये थे वादे कभी साथ जिने के कभी उसने
कत्ल हो गये हम उन्हे ये खबर नही अब तक............
शब्दांच्या जगात..
मनसोक्त उडून घ्या..
जिवनातील हे सुखद क्षण..
पुन्हा एकदा जगून घ्या..
मला एकदा थेंब व्हायचंय...
आभाळातून झर झर कोसळायचयं..
जमिनीवर बरसून मग..
तिच्यातचं विरुन जायचयं...
कुसं बदलेलं आता निसर्ग सारा
बरसतील प्रेमाच्या बेधुंद धारा
नखशिखांत भिजेल ती धरा अन
सुगंध त्या मातीचा पसरवेल वारा
आभाळ सारं आज..
गेलयं तारयांनी सजून..
चंद्र मात्र एकटा..
चांदणीची वाट पाहतोय दुरुन..
तुझ्या माझ्या प्रेमाने..
बहरेल सारं अंगणं..
भर दिवसा सजेल..
चंद्र चांदण्यांच चांदणं..
कडाडणारया ढगांना..
कुणीतरी समजवा..
कडाडण्या पेक्षा बरसने बरे..
हे त्याला उमजवा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा