काल माझ्याच आठवणी..
एकमेकांशी बोलत होत्या..
काही गप्प होत्या..
तर काही छळत होत्या..
चारोळ्यांच्या जगात...
एक चारोळी रुसली..
मोठ व्हायचं होत तिला..
अन कवितेत जाऊन फसली.
चिंब या पावसात,
पहावे भिजून कधी.
धुंद या गारव्यात,
पहावे विरून कधी.
असे नभ झरताना,
पुन्हा धरा भिजताना.
आपल्या आयुष्याची गणिते सये
आठवणीने जुळवावी लागतात ...
सरते शेवटी हेच आयुष्य मग
आठवणीचा हिशोब मागतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा